स्वराज्यसूर्य शिवराय - 20

(15)
  • 5.4k
  • 2
  • 2.3k

आग्रा येथून सुटका होऊन तीन-साडेतीन वर्षांचा काळ लोटत होता. शिवरायांनी या कालावधीत तसा संपूर्ण विसावा घेतला. स्वराज्याची विसकटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्रदयात एक जखम तीव्रतेने सलत होती ती म्हणजे पुरंदरचा तह! मिर्झाराजेंसोबत केलेल्या तहात गेलेले तेवीस किल्ले स्वराज्यात कसे येतील, कसे आणता येतील या संबंधीचा विचार शिवरायांना अस्वस्थ करीत होता. एकेदिवशी शिवराय आणि माँसाहेब राजगडावर बसले होते. राजगडापासून दूरवर असलेला कोंढाणा किल्ला दिसत होता. माँसाहेब तिकडे लक्ष लावून पाहात असताना अचानक शिवरायांकडे बघून म्हणाल्या,