हरतालिका व्रत

  • 20.6k
  • 5.7k

हरितालिका व्रत हे हरितालिका तिज म्हणुनपण ओळखले जाते .कुमारिकेने इच्छितवर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्यमिळण्यासाठी हे व्रत करावे .पार्वतीने शंकराला पती म्हणुन वरल्या नंतर त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले होते .याविषयीची कहाणी अशी आहे एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे “हरितालिका” हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.