प्रेमभाव आणि आयुष्य...

  • 9.7k
  • 2.4k

काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटून आयुष्य बदलुन जात... काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि खूप साऱ्या आठवणी साठवून जातात. काही लोक आयुष्य घडवतात. आयुष्याची वाट दाखवतात. चांगले विचार देऊन जातात. समाजातील बऱ्याच गोष्टीचं भान आपल्याला करून देतात. आयुष्य म्हणजे काय? ते कसं जगायचं ?आयुष्यात नेमक करायचं तरी काय ? या गोष्टी ते सांगून जातात. आणि आपल्याला त्याची किंमत कळत नाय वेळ निघून जाते अन् त्या गोष्टीची आठवण करून देते. आणि सरतशेवटी आयुष्या ची बेरीज शून्य लागते. त्याचप्रमाणे खडतर लोकही असतात आपल्या आयुष्यात. परंतु ती खूप निर्मळ मनाची असतात. नेहमी आपलाच विचार करणारी, ती आपल्याला समजत नाहीत.