समर्पण - १५

  • 7.8k
  • 3.2k

समर्पण-१५ अनक़हे अनसुने अनछ़ूए रहते है । कुछ रंग प्यार के अधुरे भी होते है। का बनतात अशी नाती जे थोड्या दिवसांच सुख पण आयुष्यभर पुराव्या इतक्या यातना देऊन जातात...हो...यातनाच...फक्त दुःख देऊन जातात अशी नाती..या फक्त सांगायच्या गोष्टी असतात की ज्या व्यक्यिवर प्रेम केलं त्याच्यासोबतचे आनंदी क्षण आठवा... दुःख करत बसू नका वैगरे वैगरे... पण खरं तर हे आहे की आपण जेव्हा त्या व्यक्तीचा विचार करतो किंवा त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण आठवतो त्यानंतर हे पण वाटत की काहीतरी कारणामुळे ती व्यक्ती सोबत नाही आणि याचंच दुःख जास्त होतं...त्यापेक्षा हेच वाटत की ती किंवा तो भेटलाच नसता किंवा नसती तर बरं झालं