विभाजन - 11

  • 6.2k
  • 1.9k

विभाजन (कादंबरी) (11) फ्रेंच वसाहतीची समस्या होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, माहे व यानम या प्रदेशावर फान्सचे आधिपत्य होते. तेथील रहिवासी भारतीय भारतात सामील होण्यास उत्सुक होते. ते प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारत सरकारने केली. फान्सने १९४९ साली चंद्रनगर मध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला. चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर भारतातील उत्तर प्रदेश सरकारच्या हाती सोपवले. गोव्याची सुद्धा समस्या होती. पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळविण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. या लढ्यात टी बी कुन्हा आघाडीवर होते. त्यांनी सरकार विरुद्ध