कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .अंतिम भाग- भाग - 32

  • 4.7k
  • 1.5k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन -अंतिम भाग- भाग-३२ वा ------------------------------------------------------------------------- सागर देशमुखांना त्यांच्या प्रेमालाय “मध्ये येऊन .आता पंधरा दिवस होऊन गेले होते . अचानक झालेल्या आजाराने, शारीरिक आघाताने त्यांना खूप नुकसान पोचवले होते .. त्यातून पहिल्यासारखे होणे ..सध्या तरी खूप दूरची गोष्ट आहे ..हे सत्य मान्य करायला मानसिक धैर्य लागते , मानसिक बळ लागते आणि मनात प्रबल इच्छा शक्ती असावी लागते . या सगळ्या गोष्टी ..या आजाराने जाता जाता त्यांना जणू रिटर्न –गिफ्ट म्हणून मुक्त मनाने दिल्या होत्या . ..देशमुख सरांनी वस्तुस्थिती मान्य केली होती , डॉक्टर सांगितल ते ते अगदी मनापासून ते करीत होते . दिवसभर पडल्या पडल्या