काशी - 9

  • 6.7k
  • 2.6k

प्रकरण ९ सर वयक्तिक भेट घेऊन प्रत्येकाची खुशाली विचारत होते.सर्व मुलं बागेत खेळत होती. परंतु चंदू व लक्ष्मी दोघे अभ्यास करत होते. हे बघून सरांना त्यांच्या विषयी कुतुहूल वाटले. त्या दोघांना बघून ज्ञानू व काशीची आठवण झाली.त्या दोघात ज्ञानू व काशीला बघू लागले. आज जर या दोघांना आसरा मिळाला नसता तर हि दोघे बिचारी बालमजुरी करून जीवन व्यतीत करत राहिले असते. लक्ष्मीला कोणी पळवून कोठीवर विकले असते.तर चंदू कुठे पाठीला पोक येईपर्यंत, हाताची नखं रक्तबंबाळ होईपर्यंत तर कुठे अंगावर उकळते तेल उडून अंगावर व्रण उठे पर्यंत बारा बारा तास काम करत राहिला असता---या विचारानेच सरांच्या अंगावर भीतीचे रोमांच