बळी - २५

  • 9.9k
  • 1
  • 4.6k

बळी - २५ "आज रंजना कुठे आहे? दिनेशकडे गेली असेल; तर तिकडेच जाऊया! इन्स्पेक्टर दिवाकर जाधवांना म्हणाले. त्यांना हा गुंता लवकरात लवकर सोडवायचा होता. केदारच्या आयुष्याचा प्रश्न होता! एकदा का रंजना सावध झाली; की नंतर तिला सापळ्यात पकडणं कठीण होतं. "आज ती त्याच्या घरी गेली नाही! काॅलेजलाच गेली आहे. आणि दिनेशसुद्धा सकाळपासून त्याच्या कामावर गेला आहे! त्यामुळे आज रंजना आणि दिनेश दोघंही एकत्र भेटणार