घे भरारी पुन्हां...

  • 9.2k
  • 1
  • 3k

मनोगतरात्र खुप झाली असली तरी लिहायला घेतोय कारण घडलेला प्रसंगचं असा काही होता की त्या दिवसाची कुठंही कल्पना नसताना काळाच्या ओघात जीवन अस्तव्यस्त झालं .सुरवातीला चढत्या क्रमाने जात कादंबरी ची सुरवात होते एका हरहुन्नरी तरुणांच्या संघर्षाची कहाणी आहे . मृत्युशी दोन हात करून पुन्हा आयुष्याची सुरवात करणे सोपी गोष्ट नाही .मुळात हे प्रत्येकाला जमत नाही . त्यासाठी आशीर्वाद आणि दैवी गुण आत्मसात असावे लागतात आणि ते काही मोजक्या चं लोकांच्या भाग्यात असतात . गावातील एका होतकरू तरुणाच्या मदतीला आखा गावं धावून येतो . वर्गणी करून गावात पैसे जमवले जातात . जिवाभावाचे मित्र जीवाचं रान करून गावातील सदन मंडळींकडून पैशाची व्यवस्था