प्रेमविवाह करताय? जरा विचार नक्कीच करा

  • 3.8k
  • 1
  • 1.3k

प्रेमविवाह करताय? जरा विचार करुन अलिकडील काळ हा जास्त वाईट काळ आला आहे. आता वातावरण एवढं खराब झालं आहे की आईबाप आपल्या मुलाला ओळखत नाही व मुलं आपल्या आईबापाला. त्यामुळंच मुलांवर कसे संस्कार टाकायचे याचा विचार मायबापाला पडल्याशिवाय राहात नाही. आजची मुलं शिकविणाऱ्या शिक्षकांचंही ऐकत नाहीत. याला जबाबदार कोणता घटक असावा? असा विचार केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांवर असणारा शिक्षकाच पुर्वीचा धाक. पुर्वी शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवीत असायचे. त्यासाठी ते बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे. घरी वडीलांचाही धाक असायचा. वडील शिक्षकाला म्हणायचे, "गुरुजी, मारा पिटा, काहीही करा. परंतु माझा मुलगा शिकला पाहिजे, त्याच्यात संस्कार फुलले पाहिजेत." वडीलांचं ते म्हणणं असायचं. त्यातच घरीही आईवडील