बालवीर - भाग 2

  • 4.1k
  • 1.3k

बालवीर भाग दोन फतेहसिंह व जोरावर सिंह........ते वीरच होते. त्यांचा जन्म वीरगतीच प्राप्त करण्यासाठी जणू झाला होता असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अगदी अल्प अल्प वयातच चारही भाऊ औरंगजेब बादशाहाचे शिकार झाले होते. शिख धर्म गुरु नानक यांनी स्थापन केला होता. हा धर्म हिंदू आणि मुस्लीम धर्माहून वेगळा होता. हिंदू धर्म व शिख संप्रदाय यातील महत्वपुर्ण फरक सांगायचा झाल्यास हिंदू धर्मात अनेक आत्म्याला मानलं जात होतं. परंतु शिख धर्म एकाच आत्म्याला मानत होता. आजही तसंच आहे. त्या धर्मात म्हटलं आहे की दहाही गुरुत एकच आत्मा आहे. त्यासाठी त्यांनी गुरुमतची रचना केलेली आहे. तसंच मुस्लीम आणि शिख या दोन्ही धर्माची तुलना