धर्मांतरण - भाग 2

  • 1.7k
  • 723

धर्मांतरण भाग दोन कमलची परिस्थिती नाजूक होती. त्यानं त्यासाठी तृतीयपंथी बनून भीक मागायचं ठरवलं. ती भीक नव्हती तर तो रोजगारच होता त्याचेसाठी. ते सर्व पोटासाठी होतं. परंतु त्याहून महत्वाचं होतं त्याला कळलेलं तत्वज्ञान. त्याला वाटत होतं की आर्य भारतातीलच. त्यामुळंच तो त्या तत्वज्ञानाबाबत सांगत होता, "हिंदूस्थानातील सर्व लोकं हिंदूच होते. मुळचा वैदिक धर्म हिंदू धर्म असून ह्या हिंदूपासून अनेक धर्म उदयास आले होते. मुळच्या हिंदूवर विदेशातील आलेल्या सर्वच लोकांनी अति प्रमाणात अत्याचार केले. धर्मपरीवर्तनाचा ध्यास मनात ठेवून. असंख्य हिंदूंची कत्तल केली, त्यांनी धर्म बदलवायला नकार दिला म्हणून. त्यातच त्यांची संस्कृतीही मिटवण्यात आली. त्यातच त्यांचा इतिहासही. संस्कृती माध्यम म्हणून देवळाला सर्वप्रथम