पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोप भरून पाणी तापत लावले आणि बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपाला लागा. ” त्याचे बरोबरच होते. पाच गावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगी बेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला