भाग सहा मीना ताई आणि अनघा फार्महाऊसवर येऊन पोहोचल्या . ती चांगली प्रशस्त जागा होती . सगळ्या सुख सोयी तिथे होत्या . अनघा आणि मीना ताईंनी तिथे रहायला सुरुवात केली . सुरवातीला अनघा ऑफिस ला जायची पण मग हळूहळू तिने ऑफिस ला जाणं बंद केलं . दिवस सरत होते . इथे अजित रावांनी आणि अर्चना ताईंनी त्यांच्या ओळखी च्या लोकांना , त्यांच्या सर्कल मधे हेच सांगितले की , अनघा ला त्यांनी काही दिवसांसाठी परदेशी पाठवले आहे तिथे त्यांच्या मित्राची कंपनी आहे तिथे अनघा शिकायला गेली आहे . काही दिवसांनी ती परत येईल आणि मग अजित रावांचा बिझनेस सांभाळेल .दिवस जात होते आणि