स्वराज्यसूर्य शिवराय - 24

  • 4.9k
  • 1
  • 2k

शिवरायांना राज्याभिषेक झाला. अत्युच्च आनंदाचा क्षण रयतेने अनुभवला. परंतु तो आनंद फार टिकला नाही. तो क्षण, स्वप्नपूर्तीच्या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अत्यंत समाधानाने जिजाऊ माँसाहेबानी या जगाचा निरोप घेतला. लाडक्या शिवबाला दुःखाच्या महासागरात लोटून देत आऊसाहेब निघून गेल्या. शिवरायांच्या जीवनात माँसाहेबाचे स्थान काही वेगळेच होते. एक माता म्हणून, एक मार्गदर्शक, एक स्फूर्तीमय व्यक्तिमत्व, चैतन्यमयी माता इत्यादी अनेक भुमिकांमधून त्या शिवरायांना, मावळ्यांना सतत कार्यमग्न ठेवताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत कायम तेवत ठेवत होत्या. शिवरायांना अवर्णनीय असे दुःख झाले होते. परंतु त्यांना दुःख करायला वेळ तरी कुठे होता? स्वराज्याप्रती, रयतेपोटी असलेले कर्तव्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, स्वस्थ बसता येत नव्हते. शिवरायांनी कठोरपणे दुःख बाजूला सारले.