बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ५  

(12)
  • 30.5k
  • 13k

मजल दरमजल करीत राजे आणि सारा लवाजमा आग्रा शहराजवळ पोहचला...तारीख होती ११ मे १६६६..मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिह यांच्याकडे राजांची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली होती..१२ मे १६६६. औरंगजेबाचा वाढदिवस होता..आधी ठरविल्याप्रमाणे रामसिह राजांना येऊन भेटणार होता..पण रामसिहाकडे ऐनवेळेला औरंगजेबाने दुसरे काम सोपवले आणि रामसिहाने आपला मुन्शी गिरधारलाल याला राजांचे स्वागत करण्यासाठी पाठवले..आपल्या स्वागतासाठी एक साधा कारकून यावा हे महाराजांना खटकलं..आणि पुढे त्यांची आणि रामसिह यांची चुकामुक झाली..झाली का करवली गेली ??? औरंगजेबच तो...राजांचा बसता उठता त्याला अपमान करायचा होता..पण राजे सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी सर्व सहन करत होते...आणि त्याची अशी इच्छा असावी..राजे आणि शंभु राजे