जानू - 11

  • 7.7k
  • 1
  • 3.8k

जानू आज पुन्हा चाळीतल्या आठवणीत हरवलेली असते ..अभय ची आज पुन्हा तिला खूप आठवण येते ..त्याचं पाहणं ,बोलणं ,सर्वांना मदत करन सर्व तिला आठवत असत..आणि स्वतःवर राग येत असतो की का आपण इतका राग केला त्यांचा?नकळत तिला अभय वर एक कविता सुचते निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी परी तू नेहमीच समजून घेतले मला साथ दिलीस तू दूर राहुनी हसणं माझं तुला आवडे पण तुला पाह ताच मी नाक मुर्गळे आज माझ्या नजरेत मीच अपराधी ठरले निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी फसव्या या जगापासूनी तू नेहमीच मला सावध केले बोल तेव्हा तुझे मज कटू वाटले हसून बोलण्याला