सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 4

  • 6.8k
  • 3.4k

मी ,विराज आहोत ना सोबत तुझ्या सगळ निट होईल.मग संदीप ने जबरदस्ती विक्रांत ला झोपवले. संदीप ही आता विचारात पडला होता की संयोगीता ला लग्ना आधी चे सगळं आठवत होते पण लग्ना नंतरचे काहीच कसे आठवत नाही ? असे खरच झाले असेल तर विक्रांत कसा जगणार संयोगीता शिवाय ? आणि तिची मेमरी परत नाही आली तर काय? विक्रांत ला तर ही गोष्ट सहनच नाही होऊ शकणार खूप प्रेम करतो तो संयोगीता वर. त्याला तिच्या शिवाय जवळच आपलं अस कोणीच नाही . तो नालायक मल्हार मात्र संयोगीता च्या अजून लक्षात आहे . कसे होणार पुढे ? मी काय मदत करू शकतो