निर्णय - भाग ७

  • 6.5k
  • 3.4k

निर्णय भाग ७मागील भागावरून पुढेमेघना जेमतेम आठ दिवस रहीली. तो वेळ अगदी कापरा सारखा उडून गेला. इंदीरा मनातून खूप खूष होती. दोन्ही मुलांना हवं तसं करायला मिळतंय म्हणून. तिला वाटलं आपण जर खमकेपणानी मिहीर आणि मेघनाला बंगलोरला पाठवायला हिम्मत केली नसती तर दोघांचं शिक्षण, नोकरी माहिती नाही कोणत्या दिशेने गेली असती.मेघनाचं बंगोलर बरोबर दिल्लीला पण सिलेक्शन झालं होतं. मिहीर बंगलोरला असल्यामुळे मेघनानीपण विचार करून बंगलोर निवडलं.आता या वर्षांनंतर मेघनालापण नोकरी मिळेल. मगआपल्या जीवाला स्वस्थता येईल असं इंदीरेला वाटलं.आज मिहीरचा फोन आला की तो‌ शुभांगीशी काय बोलला विचारायला हवं.विचारांच्या नादात इंदीरेचं बागेतली काम खूप लवकर संपलं. ऊद्या झाडांची पिकली पानं काढून