Nirnay book and story is written by Meenakshi Vaidya in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Nirnay is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
निर्णय. - Novels
by Meenakshi Vaidya
in
Marathi Fiction Stories
"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली
"मी निर्णय घेतला आहे. तो आता बदलणार नाही."
"एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?"
मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं.
ते कळत नव्हतं म्हणून त्यांची आणखी चिडचीड वाढत होती. शांतपणे इंदीरानी आपली बॅग भरली. आणि ती खोलीबाहेर गेली.
मंगेश दणदण पावलं आपटत तिच्या मागे गेला.ती स्वयंपाक घरात कामाला लागली. तिला उद्देशून तो म्हणाला,
"आज जेवायला मिळणार आहे नं? की तुझी बॅग भरण्याच्या नादात मला उपाशी ठेवणार आहेस?"
निर्णय.भाग१ला"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी निर्णय घेतला आहे. तो ...Read Moreबदलणार नाही.""एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?" मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं.ते कळत नव्हतं म्हणून
निर्णय भाग२मागील भागावरून पुढे…मंगेश घरातला पहिला मुलगा म्हणून खूप लाडाचा होता. या लाडामुळेच त्यांच्यात हट्टीपणा आला. मी म्हणीन ती पूर्व दिशा असं तो वागू लागला. कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. नोकरीसाठी मुलाखत तोच घ्यायचा यात तो त्याची इच्छा थोडी पुर्ण ...Read Moreअसे.नियुक्त केलेल्या मुलींचा गैरफायदा अगदी निर्लज्जपणे घेत असे.हे सगळं इंदीरेला पटत नव्हतं पण मुलांकडे बघून ती गप्प बसत असे. रोज घरात भांडणं होऊन घरातलं वातावरण बिघडवण्याची इंदीरेला अजीबात इच्छा नव्हती. मुलांच्या दृष्टीनं तिनी हे शांत राहण्याचा पाऊल उचललं होतं. मुलं कधी कधी फार चिडत.वडलांच्या विचीत्र वागण्यानी,नको तेवढ्या शिस्तीनी मुलं कंटाळली होती. त्यांना स्वतंत्रपणे वागण्याची मुभा नव्हती." आई तू बाबांना काहीच
निर्णय कादंबरी भाग४बंगलोरला पोचल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तो जे बोलला ते ऐकून इंदीरेला विचित्र वाटलं पण याला सर्वस्वी जबाबदार मंगेशच होता.मिहीर म्हणाला," आई बंगलोर स्टेशन वर उतरताच मला बाबांच्या कडक शिस्तीच्या जोखडातून मुक्त झालो याचा खूप आनंद ...Read Moreआई कदाचित तुला माझं बोलणं. आवडणार नाही पण ही माझी भावना खरी आहे. तू कशी इतकी वर्ष त्यांचा हा जाच सहन करत आलीस."इंदिरा म्हणाली, "मिहीर तुझ्या आणि माझ्या भूमिकेत फरक आहे. मला तुझ्या सारखं वाटलं जरी असत तरी मी तसं वागू शकले नसते.तुम्हा दोघांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं. कोणताही विचार करण्यापूर्वी मल दहादा विचार करावा लागत असे. तू बाहेर पडावस
निर्णय भाग ४मागील भागावरून पुढे...मिहीर पाठोपाठ मेघनापण बंगलोरला गेली.दोघही एकाच फ्लॅटवर रहात होते. मेघनाचही काॅलेज साधारण आठवड्यांनी सुरू झालं की तिही मिहीर सारखीच बिझी होणार.दोघंही इंदीरेला फोन करत पण मंगेशशी कधी बोलत नसत. यामुळे मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत असे." ...Read Moreबाप परका वाटतोय का? एवढे दिवस झाले आपण काय करतोय हे बापाला कळवावसं वाटतं नाही?"" मला माहित नाही." इंदीरा कपड्यांच्या घड्या करता करता म्हणाली." तुला कसं माहिती असणार! सांगीतलं तूच त्यांना.म्हणाली असशील बापाला कशाला कळवायला पाहिजे."इंदीरा अजीबात विचलीत न होता आपलं काम करत होती. तिच्या या वागण्यामुळे मंगेश इतका चिडला की त्याने सगळ्या घड्या केलेले कपडे उचलले आणि भिरकावून दिले."
निर्णय भाग५मागील भागावरून पुढे…मिहीर ने एकदा वेळ बघून शुभांगीला विचारलं. तिनी विचार करायला वेळ मागीतला. नंतर मिहीरचा इंदीरेला फोन आला." आई मी शुभांगीला विचारलं. तिनी वेळ मागीतला आहे विचार करायला."" तिचं बरोबर आहे.आता तिनी काही सांगेपर्यंत तिला विचारु नकोस. ...Read Moreदिवसात किंवा काही क्षणात लग्नाचा निर्णय घेता येत नाही.तू तिला सुरवातीपासून त्याच नजरेनी बघतो आहेस.तुला तिच्या बद्दल बरीच माहिती आहे पण तुझ्या मनात काय आहे हे तिला आत्ता कळलं आहे.तुझ्या मनात असं काही आहे याचा अंदाज बहुदा तिला आधी आला असेल.मुलींच्या लक्षात येतं.त्यामुळे तिला स्वतःहून विचारू नकोस."" ठीक आहे." मिहीरने फोन ठेवला.इंदीरा फोन ठेवून मागच्या अंगणातील बगीच्यात जायला वळली तसं