ध्येयसिद्धी

  • 6k
  • 1
  • 2.2k

             सन २००९ साली संदीप औरंगाबाद या ठिकाणी बी.एस.सी च्या प्रथम वर्षामध्ये शिकायला होता. त्याची घरची परस्थीती अत्यंत बिकट होती. त्याचे वडील एका कापड दुकानावर कामाला होते. त्याची आई शेतामध्ये मजुरी करायची. त्याचा मोठा भाऊही पुण्याला इंजिनिअरींगला शिकायला होता. लहाणपणापासून नेकनूर सारख्या गावामध्ये राहिलेला व कधीही आई-वडीलांना सोडून बाहेरगावी न राहिलेला संदीप औरंगाबादमध्ये जरा नाराजीतच राहायचा. त्याच्या आई - वडीलांना दोन्ही मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवताना नाकी नऊ यायचे.         त्याचवेळी संदीपला लिखाणाचा छंद जडला. वर्तमानपत्रामध्ये त्याच्या कविता, लेख, कथा छापून यायच्या. त्याला शिक्षणात अजिबात रस नव्हता. त्याला लेखक व्हायचे होते. त्याचवेळी आपले आई-वडील एवढया कष्टाने