तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता . " म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं .... " काय बोलतोय गणेश ...? काय केलं होतं ...? कोण अंजली....? " आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला . " मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं पाहिजे... रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते . " हो जायलाच पाहिजे ....." शैला ही म्हणाली " थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती. त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल..... तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता