तुझी माझी यारी - 17

  • 8k
  • 2.8k

सरु च्या आई ला भेटून आल्या पासून अंजली खूप विचारत पडली होती...थोडी शांतच झाली होती.सरु आपली जिवलग मैत्रीण ..आपल्या सोबत शिकलेली ,खेळलेली आणि तिची अशी अवस्था होऊन तिने हे जग सोडाव ..हे अंजली च्या मनाला बोचत होत.सरु ने तिला तिच्या वर होणाऱ्या छळाबद्दल ही सांगितलं होत...पणं अंजली ने तिची काहीच हेल्प केली नाही...याच दुःख आता जास्त प्रमाणात अंजली ला होऊ लागलं होत.जर खरच सरु ला तिच्या नवऱ्याने मारल असेल तर ..तर ..तर आपण ही सरु च्या आई आणि भावासारखे शांत बसायचे का ? माहित असून तोंड बंद ठेवून चाललं आहे तसचं चालू द्यायचं का ? सरु साधी भोळी होती..त्याचा फायदा