शेवटचा क्षण - भाग 4

  • 11k
  • 5.4k

गीतच्या लग्नानंतर काही दिवसांनी रोहितच्या घरच्यांकडून गार्गी साठी विचारनी झाली होती पण तेव्हा गार्गी प्रतिकची वाट बघत होती.. त्याला मनवण्याचा असफल प्रयत्न करत होती.. त्यामुळे तिने रोहितला नकार दिला होता.. आणि कारण देताना तो खूप लांब राहतो मला इतकं लांब आईबाबांना सोडून जायचं नाही मला तिकडे राहवणार नाही असं सांगितलं होतं.. आई बाबांनी तिला खूप समजावलं पण तेव्हा ती तयार नव्हती... आणि तिच्या इच्छेविरुद्ध तीच लग्न ते लावून देणार नव्हतेच... तिला वाटायचं आज उद्या प्रतीकला माझं प्रेम नक्की कळेल आणि तो परत येईल माझ्याकडे.. एकदा तिने तपास केला असताना तिला कळलं होतं की त्याच्या आयुष्यात तिच्या नंतर कुठलीच मुलगी आली