भिंतीच्या पल्याड ( भाग 1 )

  • 8.2k
  • 2.6k

रामनगरचे हे गाव तसे म्हंटले तर हे गाव छोटेसेच आहे आणि वस्तीही फारशी कमी प्रमाणातच आहे पण ईथल्या वस्त्या मात्र अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तिथे माणसांची वर्दळ फार नसायची त्यामुळे बाहेर कोणी आल तरी कळत नव्हत आणि त्यात गावात दिव्यांची सोय नसल्यामुळे सगळीकडे अंधार असायचा आणि त्यामध्ये सतत भितीच्या वातावरणामध्ये जगायला लागायच त्यात जंगली जनावरांची पण भीती होती रात्री अपरात्री लोकांवर जीवघेणा हल्ला करायचे त्यामुळे गावात काहीस दहशतीचे वातावरण पसरलेल होत ज्या ज्या परिसरात जनावरांचा वावर होता त्या त्या परिसरातील वस्तीतील लोक अजिबात घराबाहेर पडायला मागत नव्हते घाबरून घरातच बसून रहायचे काळोख असल्याने माणस खूपच सावध रहायचे कधी काय