नक्षत्रांचे देणे - १०

  • 7.3k
  • 1
  • 4.2k

'मी खोट सांगून मैत्रिणीच्या लग्नाला चंदिगढला गेले होते. त्याबद्दल मला माफ करा.' असे बोलून भूमीने नानांना शपथ दिली की पुन्हा कधीही असं खोट बोलणार नाही. परत अनाथ आणि पोरके होण्याची भीती मनात असलेली भूमी माई आणि नानांना सोडून राहण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. नानांनी तर आपल्या सगळ्या इस्टेटीतून विभासाचे नाव काढून टाकले. परत विभासच्या तोंडही पाहणार नाही, असे मनाशी ठरवले. आपल्या मुलामुळे एका मुलीची फसवणूक झाली, या विचारानेच माई अस्वस्थ झाल्या होत्या. आला दिवस अपराधीपणाची भावना त्यांना आतल्याआत खात होती. विभासला माफ करणे त्या दोघांनाही शक्य नव्हते. या सगळ्यामुळे भूमी तर आपल्याला सोडून जाणार नाही ना, या भीतीने त्यांनी