किती सांगायचंय तुला

(90)
  • 105.6k
  • 17
  • 39.6k

ट्रेन ची अनाउन्समेंट झाली असते. ट्रेन पुणे स्टेशन वर थांबली असते. आपल सगळ सामान घेऊन ती खाली उतरते. या अगोदर ही ती पुण्यात आली होती.. कित्येक दा. पण आज तिला पुणे काहीतरी वेगळे भासत असत.. टॅक्सी ड्रायव्हर ला पत्ता सांगून ती तिच्या मार्गाने निघते. काही मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचते.

New Episodes : : Every Saturday

1

किती सांगायचंय तुला - १

ट्रेन ची अनाउन्समेंट झाली असते. ट्रेन पुणे स्टेशन वर थांबली असते. आपल सगळ सामान घेऊन ती खाली उतरते. या ही ती पुण्यात आली होती.. कित्येक दा. पण आज तिला पुणे काहीतरी वेगळे भासत असत.. टॅक्सी ड्रायव्हर ला पत्ता सांगून ती तिच्या मार्गाने निघते. काही मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचते. दिक्षित वाडा ... भल्यामोठ्या शोभित भिंतीवर आकर्षित अशी नेमप्लेट वाचून वाड्याच्या गेट कडे ती वळते. गेट च्या आत मध्ये जात असतानाच तिला गेटवर वॉचमन अडवतो. "अहो कुठे जात आहात न विचारता. हे पर्यटक स्थळ नाही आहे परवानगी न घेता आत यायला. दिक्षित वाडा आहे हा." - वॉचमन त्याच्या अश्या बोलण्याने तिला ...Read More

2

किती सांगायचंय तुला - २

सगळ्यांची कॉफी पिऊन झाली असते. सयाजी राव दिप्ती ला म्हणतात, " कॅप्टन खूप छान होती ह कॉफी, मला आवडेल हातांनी बनवलेली कॉफी रोज प्यायला. करशील ना माझ्या साठी रोज?" "येस सर"- दिप्ती अगदी ऑफिसर स्टाईल मध्ये म्हणते. तसे सगळे हसतात. "चला मी रात्री च्या जेवणाच बघते"- अस म्हणून सुचित्रा ताई किचन कडे जातात. "मी पण लाइब्ररी मध्ये बसतो थोडा वेळ."- सयाजी राव. दिप्ती हातातल्या घडी कडे बघते आणि चेहऱ्यावर थोडे काळजी चे भाव आणून श्रुती कडे बघून म्हणते, " श्रुती अग सात वाजले, आपण काहीच सुरुवात नाही केली अजून. चल लवकर उठ. काय डेकोरेशन करायचं , कुठली थीम ठेवायची ...Read More

3

किती सांगायचंय तुला - ३

"ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मै जहा रहू जाहा मे याद रहे तू" दिप्ती च्या मोबाईल चा वाजतो. तशी ती जागी होते. पहाटेचे पाच वाजले असतात. ती पटकन फ्रेश होऊन येते आणि जॉगिंग साठी बाहेर पडते. बाहेर पाऊसाची रिपरिप सुरू असते. अंधार जास्त असल्याने ती ठरवते की आधी थोडी एक्सरसाईज करू मग जॉगिंग ला जाऊ. एक्सरसाईज कुठे करायची म्हणून ती सगळी कडे बघते. तिला प्रकाश दिसतो. दिप्ती त्या दिशेने जाते. तिला एक शेड दिसतो. तिथेच हा लाईट लागलेला. ते शेड चार खांबांवर उभे होते.. शेड मध्ये चार खुर्च्या आणि त्याच्या समोर टी टेबल असतो. अगदी राजेशाही काळातली ...Read More

4

किती सांगायचंय तुला - ४

गजाननाचे आगमन म्हटले की किती उत्साह, रौनक आणि प्रसन्नता असते वातावरणात आणि गजाननाच्या भक्तामधेही. तसचं वातावरण आज दिक्षित वाड्यामध्ये सगळीकडे फक्त धावपळ सुरू असते. सगळी पूजेची तैयारी सुरळीत व्हावी म्हणून सगळे आपापले काम चोख पणाने करत असतात. दिप्ती रांगोळी काढण्यात मग्न असते.. ते ही फुलांच्या पाकळ्या ची. शिवा ने इको फ्रेंडली म्हटल्यावर रांगोळी पण इकोफ्रेंडली होती. हळूहळू सगळे जवळचे नातेवाईक येण्यास सुरुवात झाली असते. सयाजीराव यांचे लहान भाऊ अशोक राव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आले असते. अशोक राव यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा श्रीकांत, शिवा पेक्षा काही वर्षांनी मोठा होता. आणि मुलगी काव्या शिवा पेक्षा लहान. ...Read More

5

किती सांगायचंय तुला - ५

रात्रभर विचार करत होती दिप्ती.. शिवा सोबत तिची झालेली अनपेक्षित मैत्री तिला तिच्या भूतकाळात घेऊन आली होती. किती तरी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. सगळ किती अचानकपणे झालं होत, तिला नव्हत पडायचं पुन्हा या सगळ्यात. पण म्हणतात ना काळापुढे कुणाचं काही चालत नाही तसे दिप्ती च झालं असते.. रात्री विचार करता करता तिला बाल्कनीत च झोप लागली असते आणि जाग येते ती अलार्म वाजतो तेव्हा.. अलार्म च्या आवाजाने ती उठली तर होती पण मन मात्र काल झालेल्या प्रसंगात अडकून होत. किती तरी वेळ ती तशीच सोफ्यावर बसून राहते. पण विचार करून काही फायदा नाही म्हणून मन नसतानाही आपल डेली रूटीन ...Read More

6

किती सांगायचंय तुला - ६

शिवा ची कार फुल स्पीड ने रस्त्यावर धावत असते. रेडिओ स्टेशन वर मस्त जुनी गाणी सुरू असतात. शिवा लक्ष कार चालवत असतो आणि दिप्ती आपल्याच विचारात मग्न होऊन काचेच्या बाहेरील हिरवळ बघत असते. एवढ्या वेळ कोणी कोणाशीच काहीही बोलत नाही. थोड्या वेळात गाडीचा ब्रेक लागतो. अचानक झटका लागल्याने दिप्ती विचारातून बाहेर येते. "पोहचवल की नाही वेळेच्या आधी "- शिवा दिप्ती ला म्हणतो. दिप्ती चेहऱ्यावर स्मित हास्य आणत हो म्हणून मान हलवते आणि दार उघडून गाडी च्या खाली उतरते.शिवा पण लगेच तिच्या मागे गाडी बाहेर येतो. दिप्ती फॉर्मली बाय करून वळते आणि शिवा तिला हाक मारतो.तशी ती जागीच थांबते आणि मागे वळून ...Read More

7

किती सांगायचंय तुला - ७

दिप्ती रूम मध्ये येऊन फ्रेश होते आणि लगेच झोपी जाते. शिवा मात्र अजूनही जागाच असतो. त्याला कॉफी शॉप मधला आठवतो.. "जर आज ती कॉफी त्यांनी प्यायली असती तर मला कळल असत माझी मैत्री स्वीकार केली की नाही ते. पण त्या बावळट मुलाने घोळ केला सगळा.."- शिवा चिडून म्हणतो.. त्याला राग येत असतो त्या मुलाचा.. मुड ठीक करण्यासाठी मोबाईल वर गाणी ऐकावी म्हणून तो मोबाईल घेतो तर त्याला आठवत की त्याने दिप्ती च्या नकळत तीच गाण मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होत. तो ती रेकॉर्डिंग लावतो आणि कार मधला प्रसंग डोळ्यासमोर आणत झोपी जातो.. तीन चार दिवस दिप्ती आणि शिवा कामात ...Read More

8

किती सांगायचंय तुला - ८

एवढा वेळ एकमेकांत हरवलेले असताना कोणी तरी दिप्ती ची ओढणी ओढत असते. तशी ती भानावर येते आणि खाली बघते.. तिची ओढणी ओढत असते.. तिला बघून दिप्ती खाली बसण्यासाठी झुकते पण शिवा चा हात तिच्या पाठीवर असल्यामुळे ती थांबते.. शिवा तरी पण तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो.. " मिस्टर दिक्षित"- दिप्ती त्याला आवाज देत असते पण शिवा मात्र तिच्यात एवढा हरवला असतो की त्याला तिचा आवाज ऐकू येत नाही. शेवटी ती त्रासून त्याला दोन्ही दंडाला धरून हलवते. शिवा भानावर येतो आणि सॉरी म्हणुन दिप्ती पासून दूर होतो. दिप्ती आदिश्रि समोर दोन्ही गुडघ्यांवर खाली बसते. " तुला नवीन फ्रेंड मिळाला तर तू ...Read More

9

किती सांगायचंय तुला - ९

शिवा त्याच्या वागण्यावर स्वतःलाच कोसत असतो. थोड तरी भान ठेवायचं ना शिवा, त्या लाहनशी वर राग काढून काही मिळणार का तुला. आणि त्यात दिप्ती ने सगळ बघितल. आता काही खर नाही आपल. अस तो स्वतःशीच बडबडतो.दिप्ती आदिश्री ला घेऊन गार्डन मध्ये बसलेली असते.आदिश्री च रडगाण सुरूच असत." बस ना बाळा, किती रडणार आहेस आणखी? डोळे बघ तुझे लाल झालेत रडून रडून"- दिप्ती तिला शांत करत म्हणते." काका मला ह्या आधी कधीच असा ओरडला नाही. माझ्यामुळे राग आला ना त्याला. मी नाही बोलणार त्याच्याशी पुन्हा"- आदिश्री मुसमुसत म्हणते." ठीक आहे, मग मी पण नाही बोलणार त्यांच्याशी"- दिप्ती" तू का नाही ...Read More

10

किती सांगायचंय तुला - १०

कामामध्ये शिवा आणि दिप्ती दोघांचेही चार पाच दिवस असेच निघून जातात. बाप्पा पण त्यांच्या गावाला परतले असतात. एवढ्या दिवसात आणि शिवाची मैत्री आणखीच घट्ट झाली होती. दिप्ती ला तर कळले नाही हे पंधरा दिवस कसे भराभर निघून गेले ते. तीच काम पण पूर्ण झालं होत. पण सयाजी रावांना वचन दिल्यामुळे तिला श्रुती ने सयाजीराव साताऱ्याहून परत येई पर्यंत थांबवून ठेवलं होतं. एवढ्या दिवसांपासून शिवा टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता आज तो दिवस उजाडला. आजचा दिवस शिवासाठी खूप महत्त्वाचा होता. एवढ्या दिवसांच्या मेहनतीचं फळ त्याला आज मिळणार होत, जर ती डील त्याला मिळाली तर. कारण तो एकटा त्यासाठी मेहनत करत ...Read More