करुणादेवी

(61)
  • 77.3k
  • 74
  • 31.5k

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले!

Full Novel

1

करुणादेवी - 1

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले! ...Read More

2

करुणादेवी - 2

अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये नवस-सायास केले. ती निराश झाली परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले. ...Read More

3

करुणादेवी - 3

शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रु थांबत ना. ‘करुणे, किती रडशील! जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पुढे मी तुला नेईन. करीन.’ ‘पुढे काय होईल, कोणास माहीत? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.’ ...Read More

4

करुणादेवी - 4

‘हेमा येतेस ना ?’ आदित्यनारायणांनी विचारले. ‘मी नाही येत !’ ती म्हणाली. ‘सा-या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी, तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?’ ‘तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला थोडेच येथे राहाता येणार आहे ? तुमचा तर माझ्यावर जीव.’ ...Read More

5

करुणादेवी - 5

शिरीष व हेमा ह्यांचे लग्न लागले. शिरीष आता प्रधान झाला होता. राहायला मोठा राजवाडा होता. सुखाला तोटा नव्हता. परंतु सुखी होता का? आपला पती दुःखी आहे, ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यावाचून राहीली नाही. प्रेमाला ताबडतोब सारे कळते. प्रमाचे क्ष किरण हृदयापर्यंत जाऊ पोचतात व तेथे काय चालले आहे ते त्यांना समजून येते. प्रेमाला जशी नाडी कळते, तशी जगात कुणालाही कळत नाही. ...Read More

6

करुणादेवी - 6

शिरीष गेल्यावर करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे, ती घरचे सारे काम करी. सासूसार-यांची सेवा करी. अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे. करुणा एकटी मळ्यात काम करी परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजुरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी ना नांगर ना बैल ! कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ? कसे तरी करुन करुणा गाडी हाकीत होती. ...Read More

7

करुणादेवी - 7

दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली. राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. शेतकरी शेतात दिसू लागली. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली. ...Read More

8

करुणादेवी - 8

शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी तर असे असावेत, राजा म्हणाला. आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यांनी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करुन म्हणाले, ‘महाराज, आता काम होत नाही. नवीन तरुण मंडळीस वाव द्यावा. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे.’ ...Read More

9

करुणादेवी - 9

एके दिवशी सकाळी करुणा त्या समाध्यांजवळ गेली होती. हात जोडून, डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या अश्रू घळघळत होते. प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे उघडले, समोर प्रेमानंद होता. क्षणभर कोणी बोलले नाही. ‘प्रेमानंद, बसा. उभे का ? परके थोडेच आहात ? शिरीषचे तुम्ही मित्र. बसा. केव्हा येईल तुमचा मित्र ? असा कसा कठोर मित्र ?’ ...Read More

10

करुणादेवी - 10

करुणा प्रातःकाळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओवरीत एकतारीवर भजन करीत बसे. दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार ? तिची गोड भजने ऐकून लोक तल्लीन होत. मुले-मुली ओंजळी भरभरुन तिला भिक्षा घालीत. करुणा स्वतःपुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ-पंगूस देऊन टाकी. ...Read More

11

करुणादेवी - 11

शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, ‘ही बघ माझी तसबीर!’ ‘कोठून आणलीस, शिरीष?’ तिने विचारले. ‘एका भिकारणीची पळवून आणली. आज मी चोर झालो.’ ‘शिरीष, असे करु नये?’ ‘परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वा-यावर टांगून ठेवायचे? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.’ ...Read More

12

करुणादेवी - 12

शिरीषने राजा यशोधरास सर्व वार्ता निवेदिली. करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला. तो म्हणाला, ‘शिरीष, तुम्ही धन्य आहात. भूमातेची कृपा, अशी पत्नी तुम्हास मिळाली आहे. कसे कर्तव्यपालन, किती निश्चय, कसे पातिव्रत्य ! शिरीष, करुणादेवीचा मी सत्कार करीन. माझ्या राज्यात अशी रत्ने आहेत, हीच राज्याची शोभा. अशी पवित्र सुंदर जीवनेच समाजाला सांभाळतात, मार्ग दर्शवितात.’ करुणादेवीची मला पूजा करु दे. पूज्याची पूजा जर केली नाही तर कल्याण होत नाही. ...Read More

13

करुणादेवी - 13

‘शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाध्यांना फुले वहायला केव्हा जायचे ?’ हेमाने विचारले. ‘प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरु नकोस, असा संदेश आहे,’ करुणा म्हणाली. ‘करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो ! मी महान पातकी आहे !’ शिरीष दुःखाने म्हणाला. ‘परंतु करुणेची पुण्याई आपला उद्धार करील. करुणा का निराळी आहे? आपल्या तिघांच्या पापपुण्याचा जमाखर्च एक करु. चालेल ना, करुणे ?’ हेमा म्हणाली. ‘हो, चालेल. तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र मिळू देत. त्रिवेणीसंगम होऊ दे, सर्वात पवित्र संगम. शिरीष कधी जायचे घरी ?’ ...Read More