ही कथा अंमलदाराच्या अंतर्मुखतेवर आधारित आहे, जो वालजी नावाच्या व्यक्तीला पकडण्याच्या विचारात आहे. अंमलदार विचार करतो की, त्याने किती वेळा या वालजीला पकडले आहे, तो किती वेळा पळून गेला आहे आणि त्यावर किती आरोप आहेत. तो वालजीला एक चोर आणि दरोडेखोर मानतो, पण त्याच वेळी तो विचारतो की, या व्यक्तीला नरकात का लोटायचे? अंमलदाराचे जीवन दुसऱ्यांच्या पाठीमागे असलेले आहे, जिथे त्याचे ध्येय गुन्हेगार पकडणे आहे. त्याच्या हृदयातील भावना मावळत जातात, माणुसकी नष्ट होते आणि तो पशू बनतो. त्याला असं वाटतं की गरिबांसाठी लढणाऱ्यांवर पाळत ठेवणे आणि त्यांना पकडणे हे त्याचे कर्तव्य बनले आहे. तो या समाजातील अन्याय आणि गुन्हेगारी यावर विचार करतो, ज्यात समाज व्यवस्था अधिक गुन्हेगार बनवते. अशा परिस्थितीत, अंमलदाराने आपले जीवन आणि कार्य यावर विचार करणे आवश्यक आहे, कारण त्याच्या कामामुळे मानवता आणि भावना मरत आहेत. दुःखी.. - 11 by Sane Guruji in Marathi Short Stories 3 2.8k Downloads 7.1k Views Writen by Sane Guruji Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description वालजी लिलीला भेटायला गेला. तो अंमलदार गाडीत होता. आकाशात आता चंद्र उगवला होता. अंधारात आकाशातील प्रकाश आला. तो अंमलदार विचारू करू लागला, 'या वालजीला का मी पुन्हा पकडू? पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल. कितीदा पळून गेलेला किती आरोप परंतु हा का चोर? हा दरोडेखोर? हा महात्मा आहे. या महात्म्याला का पुन्हा नरकात लोटू? काय आमचे हे पोलिसांचं जीवन! नेहमी दुसर्यांच्या पाठीमागं असायचं. जीवनातील ध्येय काय, तर कैदी पकडला, गुन्हेगार पकडला! आमची हृदयं शुष्क होतात, भावना मरतात. माणुसकी नष्ट होते. आम्ही पशू बनतो. गरिबांसाठी झगडणारे, त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवतो. त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं, फाशी चढवायचं! आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा! परंतु ते क्रांतिकारकही गुन्हेगार नाहीत, हे चोर दरोडेखोरही गुन्हेगार नाहीत. ही समाजरचना गुन्हेगार आहे. एक श्रीमंतीत लोळतो. दुसरा अन्नाला मोताद होतो. का हे असं व्हावं? चोर, कोण चोर? चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठारं भरून ठेवतो तो चोर? समाज ज्यांना चोर म्हणून शिक्षा ठोठावतो, ते चोर किती कर्तृत्वशाली, किती उदार, किती मोठया मनाचे! परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमोल होतात!' Novels दुःखी.. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्क... More Likes This माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 by Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 by Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ by Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ by Meenakshi Vaidya More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories