Kisse Choriche book and story is written by Pralhad K Dudhal in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kisse Choriche is also popular in Anything in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
किस्से चोरीचे - Novels
by Pralhad K Dudhal
in
Marathi Anything
चोरी टळलेली... बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या आम्ही काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा खेड्यातून आल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती. तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या.
चोरी टळलेली... बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या आम्ही काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा ...Read Moreआल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती. तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या.
किस्से चोरीचे... त्यावेळी मी जेमतेम आठ नऊ वर्षांचा असेन.त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आमच्या गावाच्या पंचक्रोशीत दरोडेखोर आणि किरकोळ चोरट्यांचीही बरीच हवा झाली होती.आजूबाजूच्या गावांत दररोज कुठे ना कुठे दरोडा पडल्याच्या बातम्या यायच्या. "काल कांबळवाडीत चोर घुसले होते" "परवा टोणपेवाडीत चोरट्यांनी ...Read Moreकरून घर लुटले""पहाटे चोरटे आपल्या गावाच्या रस्त्यावर ट्रक घेऊन आले होते त्यांच्याकडे लाठ्या काठ्या आणि गोफणी होत्या" किंवा "ते चोरटे फक्त चोऱ्याच करत नाहीत तर लोकांना बेदम मारहाणही करतात." अशा बातम्या कुठून कुठून यायच्या आणि त्या बातम्यांमुळे गावात आणि वाड्या वस्त्यांवर सगळे लोक चांगलेच घाबरायला लागले होते.अंधार पडायच्या आत सगळे लोक घरी परतायला लागले होते. लोकांच्या बोलण्यात सतत चोरटे आणि
किस्से चोरीचे भाग तीन ते एकोणीसशे नव्वद साल होते. त्या आधी मी वडगावशेरीत रुके यांच्या चाळीत राहात होतो. तेथेच रहात असताना माझे नोकरीतले पहिले प्रमोशन झाले आणि आर्थिक बाजू सुधारल्याने मी पुण्यातल्या बालाजीनगर भागात एक छोटासा वन रूम किचन ...Read Moreविकत घेतला.चाळीतल्या भाड्याच्या घरातून छोट्या का होईना;पण बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये रहायला जाण्यातला आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. घरगुती पूजा करून मी ताबडतोब या नव्या घरी रहायला गेलो. त्याच्या काही महिनेच आधी मी माझी स्वतःची पहिली दुचाकी अर्थात लुना टी एफ आर प्लस कर्ज घेऊन घेतली होती. एकंदरीत आयुष्याचा प्रवास थोडा थोडा गती पकडत होता. मी बालाजीनगरला नव्या
त्या काळी मी पुण्यातल्या वडगावशेरी गावात रुके चाळीत रहायला होतो आणि माझा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. मी पुण्यात रहात असलो तरी वेगवेगळ्या निमित्ताने पुण्याहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गावी अधूनमधून अगदी सह कुटुंबं जात असे. हा प्रसंग ...Read Moreतेव्हा अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमसाठी मला माझ्या गावाकडच्या भावाकडून बोलावणे आले होते.घरातला अत्यंत महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असल्याने तो अटेंड करणे मला आवश्यक होते.त्या काळी गावाकडे जायला एस टी अर्थात आपल्या लालपरी शिवाय दुसरा पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता आणि त्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर जायला लागलायचे. गावाकडच्या त्या कार्यक्रमाला मी माझी पत्नी आणि माझा दोन वर्षे वयाचा मुलगा असे आम्ही तिघे जाणार
किस्से चोरीचे आम्ही पती पत्नी नोकरी करत असूनही बरीच वर्षे घरातल्या कामासाठी कोणी मोलकरीण ठेवलेली नव्हती. खरे तर घरची कामे आणि नोकरीची धावपळ यात आमची दोघांचीही खूप दमछाक व्हायची;पण सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्टया परवडत नव्हते म्हणून आणि पुढे स्थिरता ...Read Moreघरकामासाठी मोलकरीण ठेवणे फारसे मनावर घेतले नव्हते. याचे कारण म्हणजे आमच्या वेळेत घरी येऊन काम करू शकणारी कामवाली मिळवणे सोपे नव्हते.शिवाय आमच्या गैर हजेरीत कुणा अनोळखी कामवालीवर घर सोपवणे आमच्या दोघांच्याही मनाला पटत नव्हते. माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर मात्र वाढलेली घरातली कामे उरकणे आवाक्यबाहेर वाटल्याने आमच्या शेजारच्या वस्तीतली एक मावशी,(आम्ही घरात सगळे त्यांना ताई म्हणायचो) स्वयंपाक आणि साफ सफाईसाठी ठेवल्या.