Swash Aseparyat book and story is written by Suraj Kamble in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Swash Aseparyat is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
श्वास असेपर्यंत - Novels
by Suraj Kamble
in
Marathi Fiction Stories
आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज या पृथ्वीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे की काय?? चंद्रासोबत त्याचे सखे , सोबती म्हणजे चांदण्या,तारका अजून जास्तच लुकलूकतांना दिसत होत्या. त्या तारकाही आपलं तेज पसरविण्याचा प्रयत्न करू पाहत होत्या. त्या शीतल प्रकाशातील तारका म्हणजे पृथ्वीने घातलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र सफेद साडीवर चमचमणाऱ्या लुकलूकित टिकल्याचं. त्याचप्रमाणे काहीं चांदण्या साडीवर नक्षीकाम केल्यासारख्या शोभून दिसत होत्या, डिसेंबर महिन्याचा तो शेवटचा दिवस होता.जिकडे तिकडे गार - गार वारा अंगाला हळूच स्पर्श करून जात होता,जणू तो मला विचारत असावा,बघ तुझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रेयसीची आठवण येते की काय???मला वाटलं हा वारा माझी थट्टा करत असेल असं मी माझ्या मनाला समजावून सांगितलं.
दिन-रात मेहनत करून , कष्ट उपसून , आपल्या पिलांना वाढविणाऱ्या त्या आई -बाबांना, आयुष्यभर साथ देऊन मैत्रीत जीव लावणाऱ्या, प्रत्येकचं मित्रांस, प्रेम हे पवित्र नातं आहे ,हे मानून, तिच्या / त्याच्या आठवणीत संपूर्ण आयुष्य एकटे वेचणाऱ्या, प्रत्येकचं प्रियकर,प्रेयशीस, आयुष्यात ...Read Moreदुःखाचे डोंगर चढतांना, डगमगून न जाता ते दुःख आपलं मानून, आयुष्याची वहिवाट चढणाऱ्या योध्यांसाठी, “श्वास असेपर्यंत ” हे पुष्प, सर्वांसाठी समर्पित...... ️ सुरज मुकिंदराव कांबळे आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज
मी अमर , माझा जन्म अगदी स्वातंत्र चळवळीच्या नंतरचा असावा. एक छोटंसं आमचं गावं. खूप काही लोकसंख्या नसणार तरी चार- पाचशे लोकं त्या गावात राहत असत. सर्वच धर्माची लोकं तिथे राहत असायचे. त्यात एक आमचं छोटंसं कुटुंब.आईच्या पोटी ...Read Moreचार - पाच जन्माला आली पण काही जन्मताच मेली तर काही एक वर्ष असताना दगावली. तो काळच तसा होता. वेळेवर औषध नाही किव्हा मग दवाखाना नसल्याने,साथीचे रोग,महामारी असल्याने जास्त मुले वाचत नसायची,त्यात मी आणि बहिण चित्रा
रस्त्याने आम्ही तीन - चार मित्र चाललो होतो. सर्वांची घरे एकाचं भागाला असल्याने आम्ही सोबत सोबत नेहमी जात असायचो आणि परत सोबतचं येत सुद्धा असायचो.पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, कुठे जाण्यायेण्यामुळे चिकचिक झाली होती. वावरातून येणाऱ्या मजुरांच्या ...Read Moreवावरातील माती लागून ती रस्त्यावर दिसत होती. काही ते मातीचे पेंड जमिनीवर घासून काढत होते.आमच्या मित्रांमध्ये खोडकर म्हणजे कैलास पण सर्व गावात त्याला कैलू म्हणत असायचे. त्याने रमश्या वर ते रस्त्यावर झालेल्या डोबऱ्यातील पाणी उडवले. त्यात रमश्या चा शर्ट आणि गांडीकडून छिद्र लागलेला त्याचा पॅन्ट भरला.
सर्वांना ते नाटक आवडलं. विशेषतः माझा अभिनय सर्वांना आवडला होता. त्या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. काहींनी त्याला पैसे स्वरुपात बक्षिसे दिली होती.सरांनी सुद्धा आमच्या अभिनयाला दाद दिली होती. पण मला काही बर वाटत नव्हतं. ...Read Moreमार खाल्ल्याने तो ही आज खरा वाला त्यामुळे पोटात दुखायला लागलं होतं. पण अभिनयाला मिळालेल्या शाबासकी मुळे त्या वेदना कुठेतरी लपून बसल्या होत्या. मला गावातील सरपंचाकडून एक वैयक्तिक बक्षीस मिळालं होतं. बक्षीस देतांना जामुनकर सरपंच म्हणाले होते की, अमर बेटा , " तू खूप छान अभिनय केला. त्या नाटकाची
यंदा च वर्ष म्हणजे मॅट्रिक च वर्ष होतं.अभ्यास कसा करायचा,इतरांशी कसं बोलायचं,नीटनेटकी ठेवण कशी ठेवायची इत्यादी चांगल्या सवयी वसतिगृहात लागल्या होत्या. शहरी मित्र,गावातील मित्र,शाळेतील सरांशी पण चांगलं जमत असायचं. वसतिगृहात सुद्धा मोठ्यांशी,छोट्यांशी मैत्री जमली होती. सर्व काही एकदम व्यवस्थित ...Read Moreहोतं. पावसाळा लागला,या वर्षीच्या अभ्यासाचा तडाका वाढवावा लागेल म्हणून सुरुवातीला अभ्यास जोरदार करायचा,असं मनात ठरवलं होतं.शाळा नियमित सुरू झाली. वसतिगृह सुद्धा नेमकेच सुरू झालेले होते. काही विद्यार्थी अजून वसतिगृहात आलेले नव्हते,तर काही आले होते. काही नवीन विध्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी येत होते, तर काही पालक आपल्या पाल्याला प्रवेश मिळतो