Memories that are cherished. books and stories free download online pdf in Marathi

जपून ठेवल्या त्या आठवणी.

........... 👰 हि काहनी आहे. दोन चिमुकल्या जीवनाची, त्याच्या निरागस मैत्रीची, अलडपनचि, बालपणीच्या प्रेमाची., लहान पणाच्या प्रतेक गोष्टी जपून ठेवणाऱ्या निर्मळ मनाची . .. ....... त्या चिमुकल्या ची नावे सई आणि साहिल त्याची अतिशय प्रेमळ मैत्री पाहून लोकांना खुप हेवा वाटाचा .लोक त्याच्या मैत्रीचे कैतुक करत. खर तर हा मैत्रीचा वसा त्यांना त्याच्या आई वडिलांन काडून मिळाला होता. ते एका छोट्याशा गावात राहत होते.नीरा नदीच्या काठावर वसलेले हे गाव अतिशय सुंदर होते.गावच्या चौबाजुने हीरवलीच्या सुंदरतेने नटलेले हे गाव. गावात बागायती शेती होती. गावच्या मध्यावर सुंदर असे मंदिर होते. मंदिरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम वायचे. लहान मुलांवर चांगले संस्कार होत असे. एकमेकांना मदत करणे. मोठ्यांचा आदर रकाने दुसऱ्या च्या दुःखात सहभागी होणे. या गावातील लोकांना खुप आवडत असे. अशा सैभागी गावात सुदामा आणि मधुकर नवाच्या व्यक्ती राहत होत्या दोघे हि अतिशय प्रेमळ स्वभावाचे. दोघांच्या घरामध्ये थोडे अंतर होते. पण शेती अगदी जवळ होती. सुदामा चे आई-वडील शेती करत होते. परस्थिती थोडी बरी पण शेतकरी म्हटल्यावर किती इन्कम असणार. पोटाला पोटभर खाण्या इतपत. सुदामा चे लग्न हि झाले होते. सुशील, संस्कारी अशी त्याची बायको होती. तिच नाव रमा होत. मधुकर मात्र शिकलेला अतिशय हुशार मधुकर चे आई-वडील हे शिकलेले सुसंस्कृत होते. आपले रति-रिवाज मानणारे होते. मधुकर चे हि लग्न झाले होते. ती हि सुशील सुंदर शिकलेली होती. तिला पण शेतीची आवड होती. शेतावर जावे मस्त निसर्गाच्या वातावरणात जेवण करवे.अगदी वेळ प्रसंगी काम पण करावे. शेतात काम करणाऱ्या मजुरांची देखरेख करवी. मधुकर गावा शेजारील एका कंपनीत जॉब ला होता. सुट्टी च्या दिवशी किंवा वेळ प्रसंगी सुट्टी कटुन शेतात येत असे. त्याची पत्नी पण आपल्या सासूबाई बरोबर येत असत. अस करता करता सुदामा व मधुकर याची मैत्री झाली. एकमेकांशी बोलणे. एकमेकांना मदत करणे. दुपारी शेतात मस्त गप्पा मरत जेवण करणे. हे तर रोजचे झाले होते. रमा व सुमन यांची हि चांगली गट्टी झाली होती. सुमन म्हणजे सुधाकर ची बायको. रमा नेहमी चुलीवर स्वयंपाक करत असे. त्यामूळे ते अतिशय रुचकर लागत असे. ते मधुकर व त्याच्या कुटुंबाला खुप आवडत असे. ... ................... ........ . ......एक दिवस रमा ला सुमन आपल्या घरी मंगला गैरी च आमंत्रण देते.दोघींच्या हि लग्नाला जास्त दिवस झाले नव्हते. रमा साधी शिंपल होती. दिसायला खुप छान होती. गोरा रंग, लांबसडक केस, भूरे डोळे. आणि त्यात लाल रंगाची त्याला हिरवा मोठा काठ हि साडी रमा घालते. सुमन हि तयार होते. सुमन हि थोडी सावली असते. पण सुंदर दागिने, सुंदर साडी ,लांब केसाचा अंबाडा त्या वर गुलछटी ची वेणी कपाळाला छान डिझाईन ची टिकली. अशी सुमन तयार झाली होती. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु होतो. आजू बाजूच्या बायका येतात. रमा हि येते. गैरी समोर खुप फराळा च़ असत. सगळ्या बायका फेर धरतात. फुगड्या खेळतात, झिम्मा. असे किती तरी खेळ खेळतात. सुमन च्या सासूबाई म्हणतात, रमा आ ग किती सुंदर. दिसते,'' तेवढयात रखमाबाई म्हणतात''.आ गा हि पहा हि सुमन मस्त च दिसते,'' गावामध्ये त्याच्या मैत्री ची चर्चा होतीच. रखमाबाई.... ....खरंच!!! सुमन आणि रमा तुम्ही खूपच छान दिसता. तुमची मैत्री अशीच राहो.....!! सगळ्या जनी....... आता दोघींनी एक छान गाण म्हणायच........ दोघी........... नाही...... नाही.......!!!!!!! एकजण तुम्हाला मैत्रीची शपद...... दोघींनी एक फेरा वरच सुंदर गाण म्हंटल ........ गाण्यानेच कार्यक्रम संपवला. त्याची चर्चा आठ दिवस लोक करत होते. निष्पाप मैत्री देवाला सुद्दा आवडते....... ....... पुढे सुदामा आणि मधुकर यांच्या संसार वेलील छान अशी फुले उमलली सूदमला मुलगा तर मधुकरला मुलगी झाली होती. बघता बघता दोघे मोठे झाले. आपल्या आई-वडिलांन बरोबर शेतात येत असे. दोघे एकत्र खेळायचे. त्यांची नावे सई व साहिल ठेवण्यात आली. सई साहिलच्या मागे लुडु लुडु पळायची साहिल सई पेक्षा मोठा होता. ती त्याला माती चा किल्ला बनवायला सांगायची नाही बनवला तर चिडायची म्हणायची........... ''काका तुम्ही त्याला मरा'' सुधाकर प्रेमाने तिला जवळ घ्याचा व म्हणायचा........''. थांब आपण त्याच घर ऊनात बांधू''।तीला खुप गंमत वाटायची. आनंदाने टाळ्या वाजवायची....'' कशी आली गंमत ; म्हणायची. मग तो जरा हात पाय आपट्यांच ती कधी रुसून बसली. तो तीला काही हि खाऊ देयाचा .सई खुप आलड।होती. दिसायला गोड असल्या मुळे ती सगळ्यांना आवडायची. एकदा सई ने शेजारी गीता नावाच्या मुली बरोबर भांडण केली. म्हणुन आईने सईला शिक्षा केली. आई म्हणली, ''सई तुला संगितल होताना कोणा बरोबर भांडायचं नाही.'' पण अग आई.......!!.. ''ती मला पहिली बोलली.'' काही सांगू नको आई रागाने म्हणते. इतक्यात साहिल येतो, ''आहो काकू तिनेच भांडण केली. नका रागावू तीला. साहिल म्हणला,... सुमन खुप चिडली होती. पण साहिल च्या बोलण्याने ती शांत झाली. व हसत हसत म्हणते, ''चुकी कोणाची असेना. पण एकमेकांचा कनवला मात्र येतो.'' ......''हू.!!.. चला नाश्ता करून घ्या'' दोघे हि गा लात हसत हसत नाश्ता करतात. दोघे खेळायला जातात.सुदामा सकाळी लवकर शेतात येतो. आणिआपले काम असतो. अकराच्या सुमारास मधुकर शेतात येतो. शेताच्या कडेला मोठे आंब्याचे होते. त्या झाडा खाली मधुकर बसतो. ......तो....'' सुदामा ये सुदामा...''.!!! अशी हाक मरतो. त्याची हाक ऐकून सुदामा येतो. सुदामा......... अरे '' मित्रा तु कामाला नाही गेला'' मधुकर . .. छे रे!! आज माझा मूड नाही. ....का काय झाले?? सुदामा म्हणला. मधुकर आज नाराज होता. कारण आज त्याचा वाढदिवस होता. सकाळ पासून त्याला कोणी happy birthday कोणी केले नव्हते. आई वडील सुमन सई तर छोटी होती. पण बाकी कोणी हि केले नाही. सुदामा..... आज संध्याकाळी... . ..!!!! ..मधुकर म्हणतो. छे?!? मला नाही वेळ....... सुदामा म्हणतो. मधु आज तुझे शेत मजूर आले नाही.. बाबांना माहीत चडत्या आवाजात उत्तर दिले. सुदाम मनोमन हसला. ''आज वहिनी नाही आल्या' मधुकर म्हणला. आज घरी पाहुणे येणार आहे.. परत मधुकर नाराज झाला. कारण त्याच्या वाढदिवसाला त्याची वहिनी म्हणजे रमा, बाजरी चीथालीपीठ आणि उसळ त्याला करून आणयची ती त्याला खुप आवडत असे. पण आज अस काही नव्हत.म्हणुन तो उदास होता. सुदाम म्हणतो.... , .....अरे संध्याकाळी माझ्या घरी पाहुणे येणार आहे. तु हि ये. ....हो नकीच असे म्हणुन मधुकर घरी जातो.. सुदामा ने मधुकर च्या वाढदिवसाची जयत।तयारी केली. काल शेतात सई, साहिल, सुमन रमा, सुदामा सगळे बसले होते. सुदामा म्हणला,,.....'' मधु चा वाढदिवस माझ्या घरी करू.'' हो चालेल!!!!! सुमन म्हणली. ''अन जेवण मी करणार'' रमा.....!!!!!.... सुमन.... आणि हो,,! हे आपण त्यांना सरप्राईज द्याच.. हो नकीच,. सई , ''माझ्या पप्पाचा वाढदिवस म्हणुन उड्या मरायला लागली.'' साहिल....''अग, ये सई कोणाला नाही सांगायच हे सरप्राईज आहे तूझ्या पप्पा ना ,'' पण मग....... माझी शपथ आहे.''साहिल ने संगितले आणि सई ने नाही ऐकले असे होत नाही. सई छान फ्रॉक घालते. सुमन पण तयार होत असते. ती मधुकरला आवाज देते. आहो,!!!!! ऐकल का तयार व्हा,, तुमचे .कपडे टेबलवर आहे.....हो हो!!तो रागात च म्हणला. सगळे सुदामा च्या घरी जातात. घरात थोडा अंधार केलेला असतो.. मधुकर घरात येताच दिवे लावले जातात. त्याच्या अंगावर व पाय घड्या म्हणुन गुलाबाच्या पाकळ्या टाकतात. हे पाहून..............