Ayushyach sar - 5 books and stories free download online pdf in Marathi

आयुष्याचं सारं (भाग-5)





सोशल मीडियाचा अतिरेकी वापर

आजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्या

जग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्ती

सोबत मैत्री करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .

आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्त

वेळ मोबाईल मध्ये घालवतात . 

सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतो

कुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं  . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .

आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .

महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पण

तिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपण

मश्गुल होऊन जातो .

तुमचं हे जग कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड ह्यावरच चालतं नवीन काही नाही त्यात तेच ते .

काय शिकता ह्यातून तुम्ही ? काहीच नाही . नेलपॅक असे पर्यंत तुमचं हे नातं असतं नेटपॅक संपला की तुमच्या नात्याची वॅलीडिटी ही संपली .

मग एकटेपणा खायला लागतो तुम्हाला तुम्ही ह्या जगाच्या दूर जाऊ शकत नाही .  चॅटिंग करणं msg फॉरवर्ड करणं . कोणी स्टेटस वर काय टाकलं कोणी कोणती पोस्ट टाकली कोणाच्या आपल्या पोस्टवर किती

कॉमेंट्स आल्या बस्स पुरेपूरे ...... वैताग नाही का येत कधी ह्याचा

असा प्रश उपस्थित होतो .

घरी असतांनाही आपण आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही .

पोरग कॉलेज ला गेलं आता एवढीच आईबाबांना समज घालून गप्प

राहावं लागतं .

कोंडमारा होतो इथे एका क्लिक बटनेवर जीवनाची सारी ससेहोलपट होते .

आपण आपली लाईफ सोशल मीडियाविना नाही का चांगली जगू शकतं ?

आपल्या जगण्याला  हेच एक माध्यम आहे का ?

असे प्रश विचारले कधी स्वतःला ? नाही ...

ह्यातून बाहेर पडायला वेळ मिळेल तेव्हा जाऊन विचारू ना !

तर ह्यातून बाहेर पडा ...

सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधून व्हाट्सएप आणि फेसबुक सारखे एप डिलीट करा .

नंतरचा काही ट्रिकस तुम्ही अंमलात आणा .

हे नियम 21 दिवस करा आणि तुम्हीच तुमच्या आयुष्यात काय बद्दल घडतो ते बघा .

नियम तुमच्यासाठी

1) शक्य तो सकाळी 5ला उठण्याचा प्रयत्न करा .

2) बाहेर पडून खुल्या आकाशात थोड्या अंधारलेल्या आसमंतात चमकणाऱ्या चांदण्याना बघा . गारव्याला डोळे बंद करून अनुभवा .

तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे काय हवं आहे ते मागा . ते मिळालं आहे ते तुमच्या पुढ्यात आहे असं स्वतः ला वाटू द्या ! हे जोपर्यत मिळतं

नाही तोपर्यंत रोज करा . पण एका अटीवर तुम्हाला त्यातून आनंद प्राप्त झाला पाहिजे . ( Visualisation process )

3) फ्रेश व्हा सकाळच्या विधी आटोपा .

4) तुम्ही विद्यार्थी असल्यास अभ्यासाला बसा . अभ्यास नसल्यास

फिरून या !

5) रोज तुमचा सातत्याने 8 ,10 तास अभ्यास नसेल होत तर

21 दिवस टाइम टेबल करून 4ला अभ्यासाला बसा आणि बघा

तुम्हाला रोज त्या वेळे वर without alarm जाग येईल . आणि अभ्यासाचा कंटाळा येणार नाही .

6 ) रोज काही न काही नवीन ज्ञान संग्रहित करण्याचा प्रयत्न करा . रोज

वर्तमानपत्र वाचा . शिकण्यासारखं काहीच नसेल तर इंग्लिश बोलायचं शिका . इंग्लिश ट्रान्सलेशन शिका . आयुष्यात तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल . ते ही कंटाळवने वाटत असेल तर gk वाचा .

7) शक्य तो मोबाइल चा डाटा ऑफ ठेवा . सतत मोबाइलकडे लक्ष घालू नका . व्हाट्सएप , फेसबुक हे अप डिलीट केल्यावर तुमचं मोबाईलकडे आधी सारख लक्ष ही जाणारं नाही .

8) रोज डायरी लिहा . आज काय केलं  , काय झालं हे तारखे निषद डायरीत लिहून ठेवा .

9) दिवसभर घरी असलं काही काम नसलं तरी दुपारी झोपायचं टाळा .

स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवा . तुम्हाला जगणं सोपं वाटायला लागेल . उदास वाटल्यास आपला बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवा

नवीन संकल्पनाचा विचार करा .  निसर्गाच्या सानिध्यात रहा .

10 ) रात्री 10 पर्यत झोपायचं ठरवा .

सोशल मीडिया गरज आहे .

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं असेल .  व्हाट्सएप शिवाय होऊ शकतं नाही . महत्वाचे ऑफिशिअल ग्रुप असतात . फाईल सेंड करायचा असतात .

स्टुडंट म्हणतील आम्हाला कॉलेजचे नोट्स शेअर करायचे असतात .

व्हाट्सएप कसं डिलीट करून चालेल ??

त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या फोन मध्ये ई-मेल ac असते .

इथून तुम्हाला प्रत्येक documents शेअर करता येतात .

सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम

1) सर्वात घातक जास्तवेळ स्मार्टफोनचा वापर केल्याने

तुमची समरणशक्ती आठवण्याची क्षमता कमी होते .

2) चिडचिडेपणाची वृत्ती निर्माण होते . व्हाट्सएप फेसबूक इतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे आणि रात्री उशिरापर्यंत जागे असणे सकाळी झोपून उशिरा उठणे .  ह्यामुळे तुमच्या जगणे विचलित झालेलं असते .

3 ) योगा , पुस्तक वाचणे ह्याचे प्रमाण नाहीसे होते .

4) कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष .

5) आयुष्यात जे साध्य करण्यासाठी आपण धडपडतो त्यांच्या पर्यत पोहचू शकतं नाही .

6) डोळ्यांवर मोबाईल स्क्रीनचा दुष्परिणाम होतो .

7 ) मेंदूची ग्रहणशक्ती कमी होऊन होऊन विसराळू वृत्ती उत्तेजित होते .

तुम्हाला काय वाटतं ??

तुम्हाला काय वाटतं . वरील बाबीचा विचार करा .  आयुष्य खूप

सुंदर आहे . सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तुम्हालाच घातक

ठरू शकतो .