Bhatkanti - punha ekda - 14 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४)

" excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या फळाकडे पाहत comment केली.
" काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन सापडलं होतं तिला. काही क्षणापुर्वी डोळ्यातलं पाणी पुसरणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली.
" काहीही चाललं असतं मला .. तिखट पाहिजे होतं जरा.. " अमोल बोलला तसा तिला त्यांच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच.
" आहे ते खा... नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू... कशी असतात माणसं... " सुप्री हसत म्हणाली.


----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------


बघता बघता संध्याकाळ झाली. दुपारचं जेवण आणि आराम, पावसासोबत झालं. संध्याकाळी पाऊस थांबला आणि सूर्य घरी निघाला.सकाळ पासून पडून पडून पाऊसही थकला होता. आकाश तंबू बाहेर बसला होता. सई कॅमेरा घेऊन बाहेर आली. अजूनही थोडा प्रकाश होता. संध्याकाळचे काही फोटो टिपले तिने.
" किती शांतता आहे ना... कसली धावपळ नाही, घाई नाही. घड्याळात बघून कामे नाहीत... कोणाला कसले रिपोर्ट देयाचे नाही... कसली deadline नाही... काही काहीच नाही. फक्त शांतता. " सईच्या अंगावर रोमांच उठले बोलताना.
" असंच पाहिजे ना आयुष्य. या सर्वाकडे पाहिलं कि वाटते इथेच रहावं. याकडे बघितल्यावर कळते, हि माणसं एवढी जास्त वर्ष कशी जगतात ते... खरंय ना.. " आकाशने स्वतःचा विचार सांगितला.
" तुझं काय ... कुठे राहतोस तू.. असा भटकत का असतोस.. " ,
" माहित नाही.. एवढं तर नक्की आहे कि मी गावातला नाही.. पण शहरातला असतो तर तिकडची लोकं एकदा तरी आली असती ना मला बघायला. "..... आकाश .
" म्हणजे??..... तुला आठवतं नाही तुझी फॅमिली ... कुठे राहतं होतास ते ... " सईने भरभर विचारलं.


त्याने एक नजर सईकडे बघितलं. पुन्हा समोर पाहू लागला. संध्याकाळ झालेली ना... सूर्यास्थ होतं होता. पक्षी घराकडे निघालेले.. गावकरी पुन्हा घराकडे परतत होते.
" मी एका नावाड्याला सापडलो.. जंगलात , नदी किनारी कुठेतरी... त्याने तिथेच राहणाऱ्या आदिवासी कडे सोपवलं मला. त्यांनी सांगितलं, ३ दिवस बेशुद्ध होतो... नदीतून वाहून आलेलो असं बोलले ते.. इथे कपाळावर जखम होती... त्यांनीच उपचार वगैरे केले. १० दिवस होतो त्या आदिवासी पाड्यात.. " ,
" मग तू नक्की कुठून आलास .. ते नाही माहित तुला ? " ,
" नाही आठवत काही.. काही वस्तू होत्या बॅगमध्ये, त्या पाड्यातील लहान मुलं घेऊन गेली मी बेशुद्ध असताना.. कागदाच्या वस्तू , पेपर्स .. पाण्यात भिजून खराब झाले.. बॅगमध्ये उरले ते फक्त कपडे आणि हा तंबू... त्याचा त्यांना काही उपयोग असता तर तेही घेऊन गेले असते.. " आकाश हसला त्यावर स्वतःशीच..
" हा कॅमेरा माझ्या गळ्यात होता असं बोलले ते. तो पण तुटलेला आणि बिघडलेला आहे. काय कळणार त्यातून.. " आकाशने सांगून टाकलं.
" तुला काहीच कसं आठवतं नाही.. " ,
" त्या आदिवासी पाड्यातील वैदू बोलला, स्मृती भ्रम झाला असेल. काही काळासाठी स्मृती नष्ट होते तशी. कशी ते माहित नाही... पण खूप प्रयन्त केला आठवायचा. धुरकट आठवते काही.... गणपती आठवतो, ' माझा गणू ' असं बोलायचं कोणीतरी... ते आठवते.. आणि एका मुलीचा चेहरा आठवतो... चष्मा लावणारी, गालावर खळी.. सुंदर हसणारी.. बडबड करणारी ... सतत हसणारी अशी एक मुलगी आठवते.. पुसट अशी आठवण... कधी कधी स्वप्नांत सुद्धा येते. नावं आठवत नाही काही.. तिला शोधलं पाहिजे म्हणून निघालो. गेल्या १०-११ महिन्यात किती फिरलो मी , ते मलाही माहित नाही. तशी कोणी दिसते का ते बघण्यासाठी. नाहीच भेटली. मग या गावा -गावातून फिरल्यावर समजलं... किती जुन्या काळात जगतात हे अजून.. काही गोष्टी सांगिल्या यांना... त्यांनीही सुधारलं पाहिजे म्हणून मदत करतो...निसर्गाची काळजी घेतली कि तो आपली सुद्धा काळजी घेतो , हे समजावून सांगितलं त्यांना... ऐकतात सगळेच... छान वाटते. भटकत असतो म्हणून भटक्या .... नाहीतर माझं नावं सुद्धा लक्षात नाही माझ्या.... एवढा फिरलो आहे ना, सगळेच ओळखतात आता इथे...पण मला जी लोकं हवी आहेत ते सगळे कुठे आहेत तेच कळत नाही. " आकाश छान बोलत होता. सईला मात्र वाईट वाटलं ते ऐकून.


" पण आता वाटते, हेच आयुष्य छान आहे. देवाची कृपा किती बघा. सर्व आठवणी पुसून टाकल्या. मी भटकायचो आणि तो चेहरा , तेव्हढा ठेवला डोक्यात. त्यात पावसाबद्दलच प्रेम सुद्धा तसंच आहे. आधी भिजायचो का माहीत नाही... पण आता पाऊस आला कि असं वाटते तो काहीतरी सांगतो आहे मला. म्हणून सारखा बघत बसतो त्याला. असो, एव्हाना माझी माणसं मला विसरून सुद्धा गेली असतील ना... मग हे असं जीवन का नाही आवडणार मला. सोबतीला आहेच ना हा निसर्ग.. नाहीतरी कुठे कोणाकडे वेळ असतो सध्या.. या निसर्गात आलो ना... कि मोकळं वाटते... त्याच्याकडे खूप वेळ असतो माझ्यासाठी... सोबतीला पाऊस आहेच.. खूप वर्ष एकत्र आहोत आम्ही असं आतून वाटते. म्हणून ते कळतो ना पाऊस मला. " आकाश स्वतःमधेच गुंतला बोलताना.
" मग .. त्या आठवणी.. त्या परत येतील का... " ...सई..
" माहित नाही.. एका गावात हॉस्पिटल होतं... तिथे जाऊन विचारलं ते एक डॉक्टर बोलले... ओळखीच्या व्यक्ती , जागा... वस्तू जर समोर आल्या तर आठवेल मला सगळं. तेव्हाच तेव्हा बघू.. " आकाशने सईकडे बघितलं. डोळ्यात पाणी दिसलं तिच्या.
" काय झालं.. ? " ,
" काही नाही... असंच काही आठवलं म्हणून पाणी आलं डोळ्यात.. " सईने डोळे पुसले.
" हेच.. आठवणी फक्त डोळे ओलं करायची कामे करतात. मलाही आलं असत रडायला कधी , पण त्या आठवणीच नाहीत माझ्याकडे.. आहेत त्याही मोजक्या , छान अश्या... जुन्या आठवणी काढायच्या कशाला... एवढं सगळं छान असताना रडत बसायचा... तेही मागे घडून गेलेलं आठवून... नाही पटतं मला. म्हणालं तर आतातरी या जगातला सर्वात सुखी माणूस मीच आहे... नाही का " आकाश हसत म्हणाला.
" हो " सई सुद्धा हसली.
" एक काम करूया आता.. आज रात्री इथेच थांबु.. उद्या पहाटे निघूया... खाली गावात जाऊया.. मंदिर आहे छानसं.. फोटो काढण्याइतपत छान आहे मंदिर... जेवणाची सोया सुद्धा होईल मंदिरात.. चला निघूया.. " सईने बाकीच्याना जमवलं आणि आकाश सोबत निघाले.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: