Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 13 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १३


कादंबरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पूजा पुढे सांगू लागली. " एक दिवस काय झालं, बाबा अगदी शुल्लक कारणावरून चिडले माझ्यावर. त्यात मधेच भावाचा विषय निघाला. तो किती चांगला आहे , मी कशी नको आहे ... का कस माहित नाही ते .. पण त्यांचा माझ्यावरचा राग बाहेर आला. त्या बोलण्यातून , मी त्यांना किती नको आहे , ते सांगून टाकलं त्यांनी. आईने माझ्या बाजूने काहीतरी बोलवं अशी अपेक्षा होती. तीही काहीच बोलली नाही. मी कोणासाठी बोलू आणि काय बोलू , माझ्याकडे विषयच राहिला नाही. त्यादिवसापासून एक विचित्र अबोला सुरु झाला घरात. आई-बाबा-भाऊ आणि बाजूला मी वेगळी. ते तिघेच बोलायचे एकमेकांशी. माझ्याकडे साधं बघायचे हि नाहीत. हे असं घरातच सुरु झाल्यावर काय असणार मनःस्तिथी. त्याचा सर्व परिणाम कामावर झाला. ऑफिसमध्ये लहान लहान चुका. बॉसला सुद्धा आवडायचे नाही. एक - दोनदा ठीक आहे. समजून घेतलं सर्वानी. पण नेहमीच त्याच त्या चुका ... कोण खपवून घेणार. म्हणजे तेव्हा काहीच बरोबर होतं नव्हते . मग विचार आला मनात, का राहत आहोत इथे आपण. उत्तर मिळालंच नाही. आणि नंतर त्या प्रश्नाचा खोलवर विचार केला तेव्हा कळलं कि आता इथे तरी थांबावे असे काहीच राहिले नाही. किंवा अडवणारे कोणी नाही. कोणासाठी उगीच अडचण बनण्यापेक्षा तिथून निघालेलं बरे , हे आलं मनात. त्याचदिवशी, ऑफिस आणि घरी , दोन्ही ठिकाणी सांगून टाकलं. ऑफिस मध्ये काही जणांना आणि घरी फक्त आईला वाईट वाटलं. त्यानंतर ४-५ दिवसांनी ऑफिसमधलं उरलं सुरलं काम संपवलं. घरी बॅग भरून ठेवली होती. ठरलेल्या दिवशी न निघता २ दिवस आधीच निघाले. बाकी सर्व झोपलेले असताना. " पूजाचे बोलणे संपले. कादंबरीच्या डोळ्यात पाणी आलं.
" ये वेडाबाई .... रडते का... हीच आहे माझी स्टोरी... आणि असं रडायचं नाही. मी बघ, ते घरी असताना फक्त एकदा रडली होती, ते शेवटचं. त्यानंतर कधीच रडली नाही. " कादंबरीने डोळे पुसले.

" एकटीच निघालीस ... तेही रात्रीची... भीती नाही वाटली का , मी निघालेली ना .... तेव्हा जाम घाबरली होती. " ,
" त्या रात्री स्टेशनवर थांबलेली. सकाळी डब्बू होता सोबतीला... " ,
" डब्बू ?? हा कोण नवीन ... कहानी मे twist का ... " पूजा हसली त्यावर.
" नंतर सांगीन . बघ ... बोलता बोलता किती रात्र झाली. " रात्रीचे ८ वाजले. दोघी पुन्हा आपल्या ग्रुपजवळ आल्या.
=====================================================================

सुप्री - संजना एका गावात रात्रीच्या मुक्कामी थांबल्या होत्या. तस बघावं तर खूप अंतर पार केलेलं दोघीनी. दिवसभरात आकाशला फोन तर लागला नाहीच. आकाशला माझा मेसेज मिळाला असेल तर बर होईल. पण कुठे थांबला असेल तो. त्याला एक फोन लागला असता तर किती बर झालं असत. असा विचार करून सुप्रीने पुन्हा आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा लागला नाही, पुन्हा लावला. त्यावेळीस मात्र लागला कॉल. रिंग वाजत होती, आकाश कॉल उचलत नव्हता. तसाच फोन वाजून वाजून बंद झाला. सुप्रीला वाईट वाटलं. संजना बोलते ते खरं आहे का ... आकाश विसरला का आपल्याला. तशीच बसून राहिली मग.

आणि आकाशचा फोन आला. " हॅलो ... हॅलो... कुठे आहेस तू .. फोन का नाही उचलत... बरा आहेस ना ... कुठे आहेस .. " एका मागोमाग एक प्रश्न सुरु झाले सुप्रीचे.
" हो .. हो .. श्वास तर घेशील जरा.... शांत हो... " आकाशचा आवाज ऐकून सुप्री शांत झाली. " मी एकदम ठीक आहे. तू कशी आलीस इथे ... एकटी आहेस कि कोणी आहे सोबतीला... " ,
" संजना आहे कि सोबत. तुलाच बघायला आले मी. तू , त्या फोटोग्राफी कॅपला गेला नाहीस ते समजलं. त्यामुळेच तुला शोधत आली. आता नक्की कुठे आहेस तू.. ",
" मला माहित नाही गं ... खूप वर्षांनी आलो आहे या भागात मी. ओळखीचे आहे ठिकाण पण नाव नाही माहित. इथे एका देवळात थांबलो आहे. " आकाशने सांगितलं.
" मलाही माहित नाही मी कुठे आहे ते , सकाळ झाली कि विचारेन कोणाला तरी... कोणते देऊळ आहे " ,
" गणपतीची मूर्ती आहे. तस गावापासून दूर हे ते मंदीर. बघ, गेल्या २ दिवसात मी कुठे गेलो नाही या देवळातून आणि इथे कोणी आलेही नाही देवळात " ,
" ठीक आहे , मी विचारते असे कोणते मंदिर आहे का ... तू थांब तिथेच ... मी येते .. नको जाऊस कुठे आकाश... " पुढे काही बोलणार आणि फोन कट्ट झाला . कदाचित पुन्हा नेटवर्क गेले.

आकाश त्या मंदिरातून पाय मोकळे करायला बाहेर आला. वाहणाऱ्या थंड हवेसोबत कुठेतरी रातराणी फुलल्याचे कळत होते. खाली गावात दिवे लागलेले होते. एक एक घरकुल उजळलेले होते. अजून तरी इथे वीज आलेली नसावी किंवा लोडशेडिंगचा प्रकारही असावा. तरी छान वाटते ना. त्या लहानग्या मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश इथंपर्यंत येतो आहे. शांत- शीतल.... वर आभाळात सकाळ पासून धरून राहिलेला पाऊस , कुठे गेला कुणास ठाऊक. त्यात अमावस्या, चंद्राची अशी सोबत कधी कधी छान वाटते. चांदण्या काय ... लपाछपी खेळात सारख्या ... असंच वाटते. लुकलुक सुरु असते नुसती त्यांची. सुप्रीचा विचार आला अचानक. कशाला आली एवढ्या दूर ती. कि आपलंच चुकलं काही. आपणच तर ठरलेल्या ठिकाणी न जाता इथे भलतीकडेच आलो. तिच्याही त्या अपघाताच्या आठवणी ताज्या आहेत. पुन्हा कुठे हरवलो तर मी... काळजी वाटणारच ना..

पुन्हा देवळात आला. काही फळे घेतलेली त्याने. तीच खात होता गेले २ दिवस. आणि लक्ष गेलं त्या गणूच्या मूर्तीकडे. " तुला कोणी भेटायला येतंच नाही का... एकटाच असतोस का इथे... " आकाशने गणूला मनातल्या मनात प्रश्न केला. साहजिकच आहे ... उत्तर मिळालं नाही. गणू तर चेहऱ्यावर एक छानसे हास्य घेऊन बसला होता. आकाश किती वेळ त्याच्याकडे पाहत होता. तू तरी काय बोलणार म्हणा. पण एक सांग जरा ..... सुप्रीला लहानपणापासून ओळखतॊस ना तू ..तिचाच गणू आहेस ना तू ... तुला कधी कळली आहे की ती... मला तर अजिबात कळत नाही ती... स्वतःच पाठवलं बाहेर आणि आता मागे मागे आली सुद्धा. माणसांनाच असे स्वार्थ असतात ना ... प्रत्येक जणं कश्या ना कश्या साठी पळत असतो. सुख कश्यात आहे, कळतच नाही कधी. आपली माणसं सोबत असणे कि स्वतःच्या शोधात फिरणे , हे सुख... तुला उत्तर मिळालं तर नक्की सांग मला, आकाश पुन्हा त्या देवळात झोपी गेला विचार करत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: