RATNAPARKHI - 3 books and stories free download online pdf in Marathi

रत्नपारखी भाग ३

रत्नपारखी भाग तीन

कुश ला आता जगावस हि नव्हतं वाटत,आधी त्याला त्याच्या वडिलांवर राग येत होता पण नंतर त्याला समजलं की त्याचा हि यात काय दोष नाहीये.मिलिंद प्रणिता दोघांनी मिळून कुश ला सांभाळलं , मिलिंद म्हणला....कुश सावर स्वतःला तू आता रडू नको त्याने काही साध्य होणार नाही, जा रश्मी चा खूनी ला सोडू नको तिला तुझ्यावर खूप विश्वास होता म्हणून तर तिने तिच्या मृत्यू आधी तुला संपर्क केला होता.हे ऐकून कुश ला आता बळ मिळाला होता,तो उठला आणि पोलीस स्टेशन ला गेला,तिथे मस्के साहेब होते, कुश म्हणला सर,काही माहित झालं का रश्मी चा खून कोणी केलाय ते,त्या वर मस्के म्हणले अरे,एवढं सोपं नाही आहे ते आता ती केस सि आय डि कडे आहे.

कुश निवांत झालं, थोड्या क्षणाची निवांती होती ती,रश्मी ची बॉडी त्यांच्याकडे होती,त्याला रश्मी ला बघायचं होत,तो त्यांच्या ऑफिस मध्ये गेला. समोरच रश्मी ची बॉडी होती,त्याने ती पहिली आणि तो तिच्याकडे गेला आणि रडून रडून माफी मागू लागला.तिथे मेहरा साहेब होते ते म्हणाले तू कोण आहेस?कुश???!!! कुश म्हणला हो...

त्यावर मेहरा म्हणले रश्मी च तुझ्यावर खुप प्रेम होत,जाण्या आधी तिने तिच्या रक्ताने तुझं नाव लिहिलं होतं , कुश ने ते वाचलं कुश....143.कुश ला आता त्याच राग अनावर होत होता, सर प्लीज , मला ही तुमची मदत करू द्या नाहीतर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार.वेलकम..कुश , कॉल मी अरुण, पण कोणाला हे समजू देऊ नको कि तू हि आमच्यात आहेस ,असं मेहरा म्हणाले.

रश्मी चा खून झालाय तिच्यावर जबरदस्ती काहीच नाही ,फक्त खून च झालाय, नक्की हव काय होत खूनि ला.तेव्हा अस्मय ला पकडून आणलं कारण तो तिथेच होता , मेहरा म्हणले ये, मला सांग तू तिथे काय करायला गेला होता?!! सर मी काही नाही केलयं मी फक्त रश्मी ला भेटायला गेला होता,अस अस्मय म्हणला.

पण तू रश्मी ला असा मेसेज का पाठवलं कि मी तुला नाही सोडणार, अरुण ने विचारलं,तेव्हा अस्मय च्या तोंडून काहीच फुटेना,तो गप्पच उभा होता भीती वाटू लागली की जर हे त्याचं घरी समजलं तर त्याच खरं नाही.अरुण म्हणला,याला इथेच राहू दे याच्यावर शंका आहे मला,हे कुश ला समजलं आणि कुश तर अस्मय ला मरायलाच निघाला.तेव्हा अरुण ने त्याला समजावलं,कि थांब अजून फक्त आपल्याला शंका आहे,खात्री नाही.

डेबू याच्या कडून सगळी माहिती घे,आम्ही आलोच, अरुण म्हणला.अस्मय ओरडला अरे मला सोडा त्या लव ला पकडा ना,त्याने केलंय हे,हे ऐकून कुश अजून सटकला.अरुण ने विचारलं लव तिथे नाही होता,त्याच काय संबंध,अस्मय म्हणला आहे कारण मी तिथे लव च्या सांगण्यावरून गेलो होतो,त्याला हि ती काही आवडायची नाही , त्या रात्री आम्ही एका मुलीची रॅगिंग घेत होतो हे रश्मी ने पाहिलं आणि त्याच विडिओ काढून तिने धमकी दिली की ती हा विडिओ कुश ला दाखवेल तर आम्ही तिला म्हणालो विनवण्या केल्या तरी तिने तो विडिओ ठेवला, दुसऱ्या दिवशीच ती कुश ला दाखवणार होती ,तर हा त्याचा गावाला निघून गेला.

कुश म्हणला म्हणजे तुला तिथे जायला लव ने सांगितलं होतं?!! अस्मय म्हणला हो,पण मी फक्त तिथे गेलो होतो,ते हि लव च्या संगण्याविरुन,मला हे समजलं होत कि रश्मी पोलीस कडे जाणार होती,आणि जर ती गेली असती तर लव फसला असता कारण त्यानेच त्या मुलीवर जबरदस्ती केली होती आम्ही तर फक्त त्याच बरोबर होतो.पण त्या आधीच रश्मी ला कोणीतरी मारून टाकले.मी काही नाही केलं, अस्मय म्हणला.

अरुण म्हणले,जा लव ला आणा, कुश म्हणला मी जातो सर, आणि तो निघून गेला.घरी गेल्यावर लव मस्त त्याच्या आई बाबा शी गप्पा गोष्टी करत होता.हे बघून अजून कुश भडकला, तो म्हणाला लव चल एवढंच बोलायचं तर अरुण सरांशी बोल,लव म्हणला ,तू पागल झालाय का,काय बोलतोय,मी का बोलू त्याचा जवळ तू बोल ना,तेव्हा डेबू म्हणला चलतो कि जबर्दास्तीने उचलू तुला.

मिलिंद म्हणला हि काय पद्धत आहे बोलायची,कुश म्हणला तेच तर पद्धत अजून घाण हवी.मिलिंद काही बोलेल या आधीच ते लव ला घेऊन गेले,तो प्रणिता वर चिडून म्हणला,आपल्या कुटंबात कधी झालय असं,तुझ्या मुलांना समजव नाहीतर माझं डोकं खराब होईल.

प्रणिता घाबरून गेली,तिला काही सुचेनासं झालं,तिथे लव म्हणू लागला की मी काही नाही केलं,मी तिला मारू कस,जरा विचार करा,त्यावर अरुण म्हणला जरी तू खून नाही केला,तरी तू एका मुलीवर जबरदस्ती तर केली आहे ना.मी....मी अस काही नाही केलंय.

अस्मय म्हणला लपवून फायदा नाही,मी त्याना सांगितलं आहे.लव अस्मय ला मारायला निघाला , तुला ते सांगायला कोण बोलला रे,नालायक जास्त चढली आहे तुला.अरुण म्हणला चूप बस नाहीतर तुला मी मरेन,लव शांत बसला.तिथे चिन्मय आला,अरुण ला म्हणला सर ,मी चिन्मय माझ्याकडे खूप पुरावे आहेत,मी तुम्हला दाखवू शकतो,त्या साठी तुम्हला मला ही तुमच्या टीम मध्ये जागा दयावी लागेल.

अरुण म्हणला कुठले पुरावे,तुमच्या कडे कसे,चिन्मय म्हणला सर मी डिटेक्टिव्ह आहे म्हणून,ठीक आहे ,दाखवा काय पुरावे भेटलेत तुम्हला,हे बघा सर,रश्मी च्या बॉडी वर रक्त होत ,पण त्यात हे रक्त O+ हि होत.

हे तुम्हला कुठून मिळाल,आम्हला कस नाही मिळालं,कारण रक्ताचं सॅम्पल तुमच्या पर्यंत पोहचलच नाही,अरुण म्हणला म्हणजे,नीट सांगा,ह्या अस्मय नेच हे सॅम्पल तिथून नाहीसे केले पण मी लक्ष ठेवून होतो म्हणून मला मिळाली,मी ह्याच्या कॉलनी त राहतो .

पण तू याच्यावर लक्ष ठेवून का होता , अरुण ने विचारलं,मी लक्ष ठेवून नाही होतो पण त्या दिवशी हा तिथे गेला,मला सवय आहे खिडकीतून डोकावून बघायची,आणि मी पाहिले याला,तुम्ही सॅम्पल तिथे ठेवून गेलेत बाहेर तेव्हा हा रश्मी च्या कपाटात लपला होता.विचारा याला,अस्मय सांग खरंय हे,तो कंटाळला होता,हो मी होतो तिथे,मी रश्मी च्या घरी गेलो पाणी घेतले,तिच्या खोलीत गेलो आणि तिचा खून झाला होता, मी घाबरलो कारण रश्मी ची आई , लिली आंटी येत होती आणि मग त्याना वाटलं असत कि हे मी केलंय, लिली आंटी म्हणाली होती की रश्मी झोपली आहे नंतर येऊन जा तरी मी तिच्या खोलीत गेलो लपून मला वाटलं की रश्मी ला आता भेटलो नाही तर ती पोलीस कडे जाईल म्हणून मी गेलो, पण मी काही सॅम्पल नाही चोरलेत.

खोट बोलतोय हा, ते बघा त्याच्या हातावर काहीतरी जखम आहे,अरुण ने पहिले तेव्हा जखम होती.अस्मय म्हणला पण हे तर मला कोणी चाकू मारलंय तेव्हा चिन्मय हसून म्हणला अरे खोटेपणाचा कळस आहे.

कुश ने विचारलं ,अरुण सर तुम्हला विश्वास आहे चिन्मय वर,तो म्हणला बघू ,तिथे लिली वर उमा ओरडू लागली होती,उमा म्हणाली लिली हे काय चालू आहे ते लोक माझ्या अस्मय ला सोडत नाहीत तुला माहित हा त्याने काही नाही केलय तू मैत्रीण आहे माझी, तू लहानपणा पासून पाहिलंय अस्मय ला.

लिली म्हणाली हो पण मी किती मध्ये मध्ये करू,रश्मी च्या वडिलांना समजलं तर ते मलाच ओरडतील.उमा संतापून तिथून निघून गेली.तिथे अरुण ला एक कॉल आला,जेव्हा अरुण ने सांगितलं कुश ला कि रश्मी च्या रूम मध्ये काही पुरावे आहेत जे ते आज रात्री घेऊन येणार होते.

तेव्हा ते पुरावे मिटवायला तिथे कोणी बाई गेली होती.अरुण ला काही समजत नाही होती,कि हि गोष्ट फक्त त्याला आणि कुश ला माहित होती तर मग तू बाई ला समजली कशी.

अरुण विचारात होता,तेव्हा कुश म्हणला मी आई ला सांगितलं होतं फक्त,बाकी कोण नाही.तेव्हा त्याने डोकं लावलं कि प्रणिता शी विचारपूस करण्यात काय हर्ज आहे.प्रणिता ला कुश घेऊन आला,तेव्हा अरुण आणि प्रणिता दोघी मेन रूम मध्ये एक तास गप्पा मारत होते.

त्यांच्यात काय बोलणं झालं,हे कोणाला माहित नाही.कुश घरी जाऊन भडकला,तो म्हणला कि काय होतंय आपल्या कुटंबात रत्नपारखी नाव आहे, आपलं बाहेर काय नाव आहे,आणि तुम्ही काय लपवता आहे एक मेकांशी,आणि का?!!!. आई तू पण,तो तिथून चिडून निघून गेला.अरुण ला म्हणला सर तुम्हला राग येत असेल पण मी काय करू हे मला ही नवीन आहे.

अरुण ने कुश ला सांभाळलं , तो म्हणला मला माहित आहे,कि हे खून कोणी केलंय पण का केलय हे उद्या समजेल तू उद्या ऑफस मध्ये लवकर ये.कुश म्हणला ओके सर,दुसऱ्या दिवशी , प्रणिता,लव, अस्मय, चिन्मय,उमा,लिली,मिलिंद,कुश,निपुण,सगळे होते.अरुण म्हणाला,खूनी ने छान प्लॅन बनवला होता पण,माझं डोकं जास्त चालत त्याला कोण काय करणार.

तुम्हला काय वाटतं कोणी केलाय??!! सगळे शांत होते,चिन्मय म्हणाला मी तर आधीच सांगितलं होतं की हा अस्मय यानेच केलंय खून.उमा म्हणाली बस,तूला काहीच वाटत नाही आहे स्वतःच्या मुलावर तू आरोप टाकतोय.चिन्मय म्हणाला राहूदे हा माझा मुलगा नाही आहे,तू ज्याच्या बरोबर राहतेस त्याच मुलगा आहे.अरुण म्हणाला नाही,हे बघ तू त्या दिवशी जे सॅम्पल दिल होत,ते तुझं होत तुला वाटलं की तुझं आणि अस्मय च रक्त सारखंय हे फक्त एक योगायोग आहे,कारण नंतर मी अस्मय च सॅम्पल घेतलं त्याने हे समजलं की तुमचं डी एन ए सेम आहे.

अस्मय ने नाही केलंय खून,हे मला कुश ने सांगितलं कारण खून कोणी केलंय हे हि कुश नेच शोधल आहे.चिन्मय ने अस्मय ला फसवलं पण का कारण फक्त त्याला हे वाटलं की तो उमा च मुलगा आहे म्हणून.कुश म्हणला अस्मय आणि लव त्याचात एवढी हिंमत नाही की कोणाचं खून करतील.

कुश म्हणला त्या दिवशी जेव्हा आम्ही रत्नपारखी वाड्यावर गेलो होतो , तेव्हा तिथून रत्न चोरी झाले होते.आम्ही सगळ्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी याची नोंद पोलीसकडे करू,पण मी विचार केल कि आमच्या वाडयात ते रत्न जिथे ठेवलं होतं त्याची माहिती फक्त बाबांकडे होती,मग चोरी झाली कशी.

आई त्या दिवशी बाबांच्या मागे गेली , वाड्याचा मागची विहीर तिथून आत जाणारा रस्ता,मी तर पाणी घायला गेलो होतो मला वाटलं की आई बाबा फेर फटका मारायला जाताय. पण मी आई च्या हातात काहीतरी पाहिलं आणि मी हि मागे गेलो तर तिथे बाबांनी एका बाई ला पकडून ठेवलं होतं ती बाई म्हणजे माझी आत्या.रत्नपारखी घरात ते रत्न कुठेत याची माहिती बाबांना आणि आत्याला माहित होत.आत्या १६ वर्षाच्या आयुमध्ये एक परप्रांत्याबरोबर पळून गेली होती म्हणून तिला आमच्या कुटुंबातून बाहेर काढून टाकला होत.

हे खरं नाही होत, कारण त्या रात्री बाबा वाड्यावर आम्हला घेऊन गेले ते फक्त आत्याचा खून करायला, ते रत्न तिने चोरले होते. बाबांना तिला रत्नपारखी कुटुंबामधून बाहेर काढून टाकयच होत.म्हणजे सगळे पैसे बाबांचे होतील,म्हणूनच त्या परप्रांत्याला बाबांनीच पाठवलं होत ,कि तो तिला घेऊन जाईल.ती पळाली न्हवती.तिच्यावर त्याने जबरदस्ती केली रोज आणि शेवटी तो तिला सोडून निघून गेला.

खरं तर बाबांनी त्याला तिला मारून टाकायला सांगितलं होतं.पण त्याने तिचा छळ केला.ती ही तिथून पळून आली.माझ्या आणि आई समोर आत्या ला मारून टाकले,हे मला माहित होत पण मी लपवून ठेवलं आणि आई ने हि.पण मला विचार हा पडला की तिथे आई तिच्या हातात काहीतरी घेऊन बाबांमागे का गेली.तो परप्रांती अजून कोणी नाही निपुण अंकल आहेत.

नंतर अरुण म्हणाला,बरोबर,आणि निपुण कडून बदला घायला,मिलिंद ने त्याची बायको स्नेहा, म्हणजे ,रश्मी ची खरी आई ला त्या दिवशी उडवून टाकलं. स्नेहा प्रणिता ची लहानपणा पासूनची मैत्रीण,तिला सगळं माहित होत, तिला मिलिंद ला मारायचं होत पण मिलिंद अजून खराब निघाला, जेव्हा त्याच्या वडिलांनी ठरवलं की ते मिलिंद च्या बहिणीला हि प्रॉपर्टीत हिस्सा देतील तिला माफ करतील,तर त्याने स्वतःच्या वडिलांना हि गोळ्यांचा डॉस कमी करून हळू हळू मारून टाकले.हे बघून प्रणिता ला समजलं होत की तो तिला हि ठार मारू शकतो.


तिला अजून हि त्या रात्री ची चीड येते जेव्हा तिच्यावर मिलिंद ने जबरदस्ती केली होती ,त्याच पुरावा म्हणजे लव कुश, मिलिंद साठी प्रेम हा पैसे, आणि पुढे त्याचा सांभाळ करणारे त्याचे मुलं.तो प्रेमाचा सोंग करायचं पण आतून तो खूप खराब होता.कुश ला हे समजलं जेव्हा त्याने त्याचा मेल वर आलेले मेसेज रिकव्हर केलेत त्यात रश्मी ने पठवल होत की "कुश मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तुझे बाबा त्यांच्याबद्दल आणि माझी आई बद्दल तिचा खून बद्दल" हा मेसेज वाचूनच मिलिंद ने ठरवलं की हा मेसेज नाहीसा करून तो प्रणिता लव कुश ला आडगाव ला घेऊन जाईल. कुश म्हणला पण रश्मी ला मिस्टर मिलिंद ने नाही मारलंय, तिला या चिन्मय ने मारलंय.


मिलिंद आणि चिन्मय हे दोघी एकदा बाहेर पार्टीत भेटले होते,तेव्हा चिन्मय म्हणला कि त्याचा डिटेक्टिव्ह च काम काय नीट चालत नाही आहे, त्यावर मिलिंद ने मस्तीत म्हणाला की मग स्वतः खून कर आणि पुरावे दे ना , अरे मजाक करतोय मी.त्या दिवशी बदल हवा म्हणून मिलिंद ने त्याच्या कुटुंबाला वाड्यावर आणलं होतं आणि तिथे रश्मी पोलीस कडे स्नेहा च खून च पुरावा घेऊन जाणार होती, तेव्हा चिन्मय ने तिच्यावर हल्ला केला, मिलिंद ने फक्त पुरावा नष्ट करायला सांगितलं होतं पण त्याने तिचा खून केला आणि सगळं अस्मय वर टाकलं उमा शी बदला घायला.


अरुण म्हणाला म्हणजे चिन्मय ने केलंय तर, कुश म्हणला हो,पण मिस्टर मिलिंद च्या सांगण्यावरून हा त्याचा प्लॅन होता ,त्याना चिन्मय कडून सूड घ्याच होता, उमा कडून पण आणि अर्थात अस्मय कडून पण.अरुण म्हणला पण रश्मी कडे पुरावे कुठून आले,आई ने दिले होते तिला,आई एवढे वर्ष झाले मिस्टर मिलिंद बरोबर त्या साठीच होती.मिलिंद ने ३खून केलेत म्हणजे कुश ची आत्या,स्नेहा आणि रश्मी.


कुश म्हणाला आणि माझे आजोबा जे खरे रत्नपारखी होते.मिलिंद हसला आणि म्हणाला काय फायदा मला तुम्ही शिक्षा नाही देऊ शकत,मी न्यायाधीश आहे,मी जेल मध्ये कधीच जाणार नाही,आणि तो तडफडू लागला,त्याला कोणीतरी विष दिल होत,सोयरीने ने दिल होत, मिलिंद च्या बहिणीची मुलगी,निपुनची,त्याचाबद्ल च स्नेहा ला समजलं होत आणि ती रडत रस्त्यावर निघून गेली होती.
प्रणिता ला हे स्नेहा ने सांगितलं होतं म्हणून तिने सोयरीला नीट ठेवलं होतं.मिलिंद ला नोट्स लिहायची सवय होती,पण त्याला पासवर्ड होता,प्रणिता ने शोधून काढून सगळं वाचलं आणि तिला पुरावा मिळाला.


रत्नपारखी कुटुंबाला हव असणारा बदल त्याना तर महागात पडला, कुश ला खूपच कुश म्हणाला की जर हा बदल साठी नसतो गेलो , आणि रश्मी च्या प्रेमाची वाट न बघता स्वतः तिला सांगितलं असत तर.बदल हवा,असा नको.