Live in part - 12 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन भाग - 12

जेवण झल्यावर अमन च्या बाबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला .आता अमन चे शिक्षण पूर्ण जाहाले होते .त्याला बऱ्या पैकी चांगल्या पगाराची नोकरी होती .आणि पगार काय? आज न उद्या वाढेल च अस साध सोप त्याच लॉजिक होत . शिवाय त्याच पुण्यात ल घर ही अमनच च आहे की, गावाकडची जमीन, आंब्याची बाग सगळ अमनच आहे ...मग लग्न करयला काहीच हरकत नाही .शिवाय लग्न कार्य ह्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात, अस त्याच म्हण होत.त्यात त्याची आई च ही हेच म्हण होत .शिवाय मुलगी शिकलेली असेल, तर ती नोकरी करू शकेल ...म्हणजे त्यात ही अमन लाच मदत होईल .अमन ला त्यानी नीट समजवून संगितले .त्याच म्हण फक्त एवढच होत की ब्राह्मण मुलगी घरात सून म्हणून यावी . त्यानी अमन साठी मुली ही बघायला सुरवात केली होती .अमन नी त्याच बोलण ऐकून घेतले .पण, तो काहीच बोलला नाही .तो शांतच होता ....अमन च्या बाबांना ते खटकले, त्यानी तस त्याच्या ला ही संगितल .आईला ही ते जाणवले .रात्री जेवण झल्यावर तिने त्याच्याशी बोलायच ठरवल .ती अमन कडे आली आणि, चल, आपण शत पावली करू, अस म्हणून त्याला बाहेर घेऊन गेली .अमन ही आई ला नाही बोलू शकला नाही, कारण त्याला ही रावी बदल घरी सांगायच होत .जर आई ला संगितले, तर ती बाबांना समजवून सांगेन, म्हणून त्याने आधी आईला सांगायच ठरवल .आई आणि अमन निघाले, शत पावली करयला ....आई ने एक्ड्च्या तिकडच्या आधी गप्पा मारल्या, आणि एकदम विषयाला च हात घातला . ;अमन, तुझी तिथे कोणी मैत्रीण तर नाही ना ......; अमन ला ही आईने विचारल्या मुळे जरा हुरूप आला ...तो लगेच म्हणला .... आई, हो, मझी एक मैत्रीण आहे ...म्हणजे मी, .....हे ....सगळ बाबांना आणि तुला सांगणार च होतो ....ते ऐकून
त्याच्या आईला थोडा धक्का बसला, पण तिने तस दाखवले नाही, कारण मग अमन नी तिला काही संगितले नसते .त्याच्या मनात काय आहे, हे जाणून घेणे खूप गरजेचे होते .
अमन सांगू लागला .मी कॉलेज मधे होतो, तेव्हा एक मुलगी आमच्या ग्रुप मधे होती ...रावी ...रावी नाव तीच .खूप सुंदर दिसते ..अगदी एखद्या परी सारखी .... ती पंजाब ची आहे .कॉलेज मधे होतो, तेव्हा मैत्री जाहली . हळू हळू प्रेमात पडलो ...मग, कॉलेज झल्यावर दोघे ही तिथेच जॉब करू लागलो .त्यावेळी ती हॉटेलवर रहायची आणि मी रूम घेऊन ....पण दोघांन कडे ही ऐत्के पैसे नव्हते, की आह्मी घरच भाड देऊ शकतो .मग आह्मी ठरवल की, दोघे ही लिव ई न मधे राहू ...मग थोडे पैसे ती दयची, थोडे मी .... दोघे ही खूप खुश रहायला लागलो . दोघे ही खूप स्ट्रगल करत होतो .चौदा चौदा तास काम करत होतो .तिला मोठी हेरॉईन व्हायची ...म्हणजे, तिने अगदी त्याच्यासाठी बारा बारा तास ऑडिशन दिली .तिने अगदी छोट्या जाहिराती पासून सुरवात केली . हा ....अजून तिला पहिजे अस, काम नाही मिळाले ...पण, तिला साएड हिरोईन म्हणून काम मिळालय .ती खूप छान काम करते ...तू तिचा शो एकदा पाहा ..तुला खूप आवडेल .आई मला तिच्याशी लग्न करायचय ....मला ती खूप आवडते .माझ खूप प्रेम आहे तिच्यावर ... आई प्लीज तू आणि बाबा लग्नाला परवानगी द्या ना ...तू बाबांना समजवना . ते तूझ ऐक्तील .तुम्हाला दोघांना ही रावी आवडेल ......प्लीज ...प्लीज ...आई .....प्लीज लग्नाला होकार दे ना .....अमन च बोलण ऐकून, आईला धक्का तर बसलाच, पण ह्याला कस सम्जावावे तिला काहीच कळेना ...शिवाय हे सगळ अमनच्या बाबांना कळाले, तर ते काय करतील? ह्याची कल्पना ही तिला करवे ना ... शिवाय अमन ही त्या मुलीसोबत राहतो ....म्हणून त्याला ही सम्ज्व्णे तिला कठीण जात होते . आई शांत होती . तिने अमन शी सकाळी बोलायचे ठरवले . तस अमन ला तिने संगितल . दोघे ही शत पावली करून घरी परत आले .
अमन ला वाटले होते, की, हे सगळ कळल्या वर आई त्यांच्यावर रागवेल त्याला ओरडेल, मारेल, बाबांना सांगेल, मग बाबा ही रग्व्तील ....आणि मग रावीला आपल्याला विसरून जा म्हणून संगितल .पण, तस काहीच जाहाले नाही . आई काहीच बोलली नाही ...म्हणजे तिला हे मान्य आहे .आता ती बाबांना ही मनवेल .....मग बाबा रावी च आणि माझ लग्न लावून देतील .सगळ मझ्या मनासारखे होईल . अमन खूप खुश झाला .त्याला वाटू लागले ...खरच बर ...जाहाले आपण बाबांशी बोलायच्या आधी आईशी बोललो .तिलाच समजत मला काय पहिजे ते .....आता फक्त रावी ला हे संगितल, आणि ती लग्नाला तयार जाहाली म्हणजे मिळवले . अमनच टेन्शन दूर झल्यामूले त्याला चांगली झौप लागली .पण ई कडे अमनच्या आई ची झौप मात्र उडाली .अमन आणि त्याच्या बाबाच्या मधे तिचा फूटबॉल होणार ही तिला माहीत होते . ती त्यावेळी काही बोलली नाही, म्हणजे तिला अमन च वागण पटल अस नव्हते .अमन चे बाबा कितीही चिडले, तरी त्याच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या पाहिजेत, ह्या मताची ती होती ....त्यामुळे रात्री झौप्ताना तिने अमनने जे जे संगितल ते सगळ बाबांना सांगून टाकले . ते ऐकून बाबांना धक्का ही बसला, आणि अमन चा राग आला . त्याच्या मनला खूप अपराधी असल्यासारखे वाटू लागले .आपण ज्या मुलांसाठी आयुष्य भर कष्ट केले ..त्या मुला कडून एकच अपेक्षा ठेवली . की त्यानी प्रेमविवाह करू नये .तस त्याना त्याबद्दल वारंवार बजावले ही, तरीही अमन तसाच वागला .बर तो त्या मुली सोबत एकत्र रहातोय, हे त्याने आपल्याला संगितले सूध्हा नाही .....त्याच्या मन त्याना फार खात होते .होती नव्हती, ती सगळी ऐज्जत गेली .ब्राह्मण मुलगी जर ह्या घरात सून म्हणून नाही आली, तर सगळी लोक तोंडात शेण घालतील .अमन चे बाबा खूप चिढ्लेले पाहून अमनच्या आईने त्यांना समजावले . उद्या सकाळी अमन शी बोलू, त्याला नीट समजवून सांगू, तो आपले ऐकेल ....अस बोलून त्याना आधार दिला . अमन च्या बाबांना ही त्याच बोलण पटल ....आणि ते थोडे शांत जाहाले . रात्र भर अमनच्या आई आणि बाबा दोघांना ही झौप काही आली नाही .फक्त ह्या कुशीवरून त्या कुशीवर ते होत होते .
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले ...आंघोळ, पूजा उरकून सगळे नाष्टयाला आले . अमन ही आला .नाश्ता झल्यावर अमन ची बहीण तिच्या मैत्रिणी कडे निघून गेली . घरात फक्त अमन त्याची आई आणि तोच होता .मग, अमनच्या बाबांनी च स्वत हून विषय काढला . अमन रात्री, तूझ्या आई ने तू तिला शत पावली करताना जे काही सांगितलस ते मला संगितल .ते सगळ ऐकून आह्मां दोघांना फार मोठा धक्का बसला तू अस कधी वागशील, अस अह्मला कधीच वाटल नव्हते . बर ......जे जाहाले ते जाहाले ...पण, ह्या पुढे तू पुण्यातच नोकरी करावी, अस अह्म्ला वाटत . एथे आमच्या जवळच तू राहव. एथे मी बघतो तूझ्या नोकरीच ..