Love of things .. books and stories free download online pdf in Marathi

गोष्टीतले प्रेम..



💗..गोष्टीतले प्रेम आणि मन..💗



ही गोष्ट खुपचं मनाला भावुन घेणारी आहे... ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी...तुम्हाला नक्कीच ही गोष्ट आवडेल...


असेच काहीस घडले परीच्या आयुष्यातही...

परी खूप हुशार , खूप बोलणारी, मन मिळावू आणि खुप सुंदर , तिचे हसणे एवढे मोहक कि दु:खही पळून जाणारे, वडिलांच्या निधना नंतर स्वतःला खुप मोठी समजायला लागली होती...तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण,समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच, ओळखणारी, घरच्या परिस्थितीने गांजलेली पण, तरीही आकाशाला झेप घेणारी स्वप्ने पाहणारी अशी ही परी सर्वांनाच हवी हवी असणारी.....

परी कॉलेज मध्ये असताना शांतच असायची त्यामुळे, तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी जास्त ओळखत नव्हते,पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडिलांच्या निधना नंतर ती तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणी बरोबर फोन वर गप्पा मारू लागली होती कारण फोन वर बोलून ती स्वतःचा विरंगुळा करत होती......असेच एकदा सोशल नेटवर्किंग सायीट वरून तिची ओळख, तिच्याच कॉलेज मधला मित्र महादेव शी झाली, महादेव खूप प्रेमळ, खूप समजंस आणि खूप साधा, चांगुलपणाचा तो एक मूर्तिमंत उदाहरण होता.....कॉलेज मध्ये शांत असणारी परी आता महादेवशी फोन वर तासनतास गप्पा मारत होती, ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळे ,त्या त्या वेळी ती दोघे फोन वर बोलत होते ,त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या कि त्यांना वेळेचे आणि भुकेचे भानही नसायचे.....

असेच एकदा महादेवने परीला मन आणि प्रेमाची गोष्ट सांगितली,महादेव तिला सांगतो.....




" मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते,, एके दिवशी ती दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात लपाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य प्रेमावर येते आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडते,, मन एका काटेरी झुडुपा मागे लपल्या मुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही कारण त्याला असे वाटते मन एवढी नाजूक आहे कि ती काटेरी झुडुपामागे लपुच शकत नाही म्हणून प्रेम प्रत्येक काठेरी झुडुपाला काठीने मारत असतो ,,प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी तो त्या काटेरी झुडुपा मागे येतो...पाहतो तर काय त्याची मन विव्हळत होती ,, तिचे डोळे रक्ताने माखलेले होते ,, प्रेम खूप घाबरतो.....खूपआरडा ओरडा करतो,, पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत नाही,, शेवटी प्रेम मनाला घेवून डॉक्टर कढे जातो.....डोळ्यात काटे गेल्याने मन आंधळी होते,, मनाचे डोळे जातात ,, म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम आंधळे असते आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात....

परीला तशी हि गोष्ट नवीनच होती , तिने पहिल्यांदा ऐकली होती....पण हि गोष्ट ऐकून भावूक परी स्तब्धच झाली होती आणि ह्या गोष्टीनंतर ती महादेवच्या केव्हा प्रेमात पडली हे तिला देखील कळले नाही,, आता मात्र परीला फक्त महादेवशीच बोलावेसे वाटत होते,, तसा महादेव तिचा कॉलेज मित्र.....

पण तरीही त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नव्हते..... कदाचित त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे महादेवला ही परी आवडायला लागली होती ,,असेच एके दिवशी परी महादेव, ला आपल्या मनाच्या भावना फोन वरच व्यक्त करते तिला वाटले, महादेव हि तिच्यावर प्रेम करतोय पण महादेवने तिला नकार दिला पण,तरीही महादेव परीला म्हणाला ,,”मला तुला एकादा मिठीत घ्यायचय”,, दुसऱ्याच दिवशी महादेवच्या मित्राची लग्नाची पूजा असते ,

महादेव परीला ही आमंत्रण करतो.....तसेही महादेव ला भेटण्यास परी उत्सुक असते , परी नटून थटून महादेवच्या मित्राच्या पूजेला जाते वाटेतचती महादेवला भेटते, खूप खुश होते.....त्याला पाहून तिच्या मनात काहूर माजतो पण एक विलक्षण भीती हि तिला जाणवत होती, पण महादेवला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती कदाचित महादेव चेही हेच, झाले होते परीची सुंदरता व मोहकता पाहून तो हि त्याच्या मनाला नाही आवरू शकला आणि ते दोघे समुद्रावर, फिरायला जातात, पाहतच क्षणी ती दोघे एकमेकांचे झालेले होते, प्रत्येक प्रेमी युगुलां प्रमाणे तेही प्रेमाच्या, बाहुपाशात वचनबद्ध होतात.....

आज परी खूप खूप खुश होती, तशी महादेवची अवस्था पाहण्या जोगी नव्हती महादेव हि खूप खुश होता, शेवटी अति रात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात ,दुसऱ्या दिवशी परी महादेवच्या फोनची आतुरतेने वाट पाहत, होती आणि महादेवचा फोन येतो परी खूप उत्सुक होती त्याच्याशी बोलण्यात, कारण आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालेले होते.....पण ज्यावेळी महादेवचा फोने येतो तेव्हा परीच्या पायाखालची जमीनच हादरते, महादेव परीला म्हणतो , "माझे खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत "त्याचे तो तिला कारण हि सांगतो महादेवच्या मोठ्या भावाचे,म्हणजेच जितेंद्रचे सोनालि नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम, होते त्यांचे प्रेम अगदी लहानपनापासून होते ज्या वेळी जितेंद्र,त्याच्या आई वडिलांना हि गोष्ट सांगतो तेव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदय, विकाराचा झटका येतो त्यामुळे त्यांचे लग्न नाही झाले,आणि ह्या मुळे महादेव हि परिशी लग्न नव्हता करणार....तरीही महादेव आणि परी एकमेकांना भेटत होती, फिरायला जाणे चित्रपट पाहणेहे त्यांचे नेहमीचे झाले होते....

परी आणि महादेवच प्रेम दिवसेंदिवस बहरत होते आणि एके,दिवशी महादेवच्या बाबांनी महादेवचे लग्न ठरवले,ती मुलगी महादेवच्या गावाची होती महादेव ने हि त्या मुलीला होकार दिला.....आता मात्र महादेव परीला टाळू लागला होता तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता पण,त्याचा काही परिणाम परि वर होत नव्हता, ती रडत असे भांडत,असे पुन्हा त्याला फोन करून त्याच्याशी बोलत असे......

लग्न ठरल्यानंतरही परी आणि महादेव एकमेकांना भेटत होते, तेच नाते, तेच प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते, जसजशी महादेवच्या लग्नाची तारीख जवळ येत होती, तस तसे परीचेप्रेम फक्त वाढतच चालले होते परीला आता महादेव शिवाय राहणे खूप,कठीण होवून बसले होते आणि एकेदिवशी तिला महादेवच्या लग्नाची तारीख समजते परीला खूप त्रास,होत होता म्हणून ती कसला हि मागे पुढे विचार न करता महादेवला लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली.....

पणत्यामुळे ती महादेवच्या आणखीणच जवळ गेली....महादेव ने लग्न मोडावे म्हणून ती महादेव ला विनवणी करू लागली पण घरच्या परिस्थितीने, गांजलेल्या महादेवच्या हातात काहीच नव्हते , कारण एका बाजूला त्याचे आई बाबा तर एका बाजूला त्याची परी,लग्नाचे दिवस जसे जसे येत होते तस तसे परी आजारी पडू,लागली होती पण तरीही ह्याचा महादेववर काही परिणाम होत,नव्हता आणि शेवटी महादेवच्या लग्नाचा दिवस उजाडला,आता मात्र सगळे परीच्या आणि महादेवच्या हाताबाहेर गेलेले होते,परी खूप रडत होती काय करावे तिला सुचत नव्हते आणि जे होवूनये तेच घडले अति रडल्यामुळे आणि अति विचारामुळे परीचा ब्रेनहेमरेज झाला आणि ती गेली.......

पणशेवटच्या क्षणालाही परी महादेव ने तिला सांगितलेल्या, मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती , कारणतिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती...तिच्या मरणाने महादेव ची अवस्था पाहण्यास किंवा तो खुश आहे कि दु:खी हेपाहण्यास ती राहिली नाही....तिने नीलचा,तिच्या घरच्यांचा आणि ह्या जगाचा कायमचाच निरोप,घेतला होता, कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना तिने तिच्या महादेवशी केली आणि महादेवचे प्रेम तिला खोटे वाटले....पण,तरीही परीला शेवटच्या क्षणी सुद्धा तिचे मरण महादेवच्या बाहुपाशात व्हावे असेच वाटत होते, आणि शेवटची ती इच्छाही पूर्ण करण्यास महादेव अपयशी ठरला होता.....😢😢




परी..👰