Sangharsh - 2 books and stories free download online pdf in Marathi

संघर्ष - 2

सदा अमन च्या जवळ जाऊन बसला. जसकी त्याला काही तरी बोलायचे होते. पण अमन ला येणारा तो दारूचा वास आणि घरी येत येत कुठे तरी पडल्या मुळे कपडे पण घान झालेले.सदा काय बोलणार इतक्यात अमन ताडकन रागाने तिथून निघून गेला.जे सदाला बोलायचे होते ते त्याच्या घाशा मध्येच राहिले
तेवढ्या मध्ये उमा सदा ची बायको आली आणि त्याचे हे असे अवस्ता बघूून बोलली " काय बाई या माणसाचं रोजचं झालं आहे. दारू पिऊन कुठे भी पडायचं. आणि आमच्या डोक्यालाा ताप करायचं. मरत कसं नाही काय माहिती हा माणूस" रागात बोली
"मरणारचाय. मरणारचाय मी मेेेलो की बसा मग रडत "
सदा ही रागात बोलला
या गोष्टी वरून त्यांचेे भांडण पुन्हा सुरू झाले अमन घराचा बाहेरच बसला होता.तो ही हे सर्व भांडण एकत होता त्याला या सर्व गोष्टीचा खूप राग पण याचा
त्याला खूप राग याचा
त्याच्या वडिलांचा ते असे का ? रोज दारू का पितात ? आई सोबत आज्जी सोबत का भांडण करतात ? अशा असंख्य प्रश्न त्याच्या मना मधे येत होते.
कधी शाळे मध्ये पालक मीटिंग असेल तर त्याचा घरचे कधी येत नसे मुळात याला च त्यांना न्हायचे न्हवते. आई काम मध्ये आज्जी ल काय शाळे मधले माहिती नव्हते आणि बाप असा पूर्ण दिवस पिऊन कुठे पण पडणारा
तसा अमन शाळे मधे जात हुशार न्हवता पण त्याला शिकायची खूप इच्छा होती.सदा सारखीच पण घरचे रोजचे भांडण आणि होणारा रोजचा त्रास त्या मुळे त्याचा अभ्यास नीट होत न्हवता
शाळे मध्ये पण ४०,५० पोर शिक्षक तर कोण कोण कडे लक्ष देणार त्यातल्या त्यात बर्या पैकी मुलाची परिस्थिती ही अमन च्या घरा सारखीच होती
कसे बसे त्याच्या आई आणि आज्जी संसाराची गाडी ओढत होते.
अमन आता ९वी मध्ये गेला होता. थोडा फार समजदार ही झाला होता. त्या वर्षा मध्ये त्याची गावची जत्रा होती त्या मुळे त्याला एकट्याला घरी सोडून जत्रेस जाण्यात काय हरकत न्हवती. पण पिदाडा बाप यांच्या मध्ये काय होणार तर नाही ना ? या ची त्यांना काळजी वाटत होती. अमन समजुदार होता पण सदा चे काय ?
अमन ला हे सर्व गोष्टी कळल्यावर तो बोला "काय काळजी करू नका मी सांभाळून घेतो सर्व तुम्ही जाऊन या निवांत "
"अरे पण तुझा बाप.?"असे त्याची आज्जी बोली
"काही काळजी करू नका त्यांना पण सांभाळून घेल"
अमन चे असे बोलणे एकूण उमा आणि त्याची आज्जी दोघांच्या डोळ्यात पाणी आले. "किती समजुदर झाले आहे माझे लेकरू " उमा आपले डोळे पुसत पुसत बोली
तसा पण जत्रे मध्ये जाऊन याचे एकाच दिवसाचा प्रश्न होता.त्या मुळे त्यांना जास्त काय वाटले नाही. दुसऱ्या दिवशी जात्रे साठी ते निघाले जाता जाता अजून एकदा अमन ला समजाऊन सागितले "काय वाद घालत बसू नको. तुझा बापाशी पिऊन आले. तुला काय बोल तरी काय बोलू नको"
"हो आई काही काळजी करू नको तुम्ही नीट जाऊन नीट या " उमा आणि आज्जी ने त्याला कुरवाळले आणि जत्रेसाठी गेले
दिवस भर सदा बाहेरच होता दारू पितच फिरत असावा त्या मुळे अमन घरीच अभ्यास करत बसला होता. दिवस भर अभ्यास करत असल्या मुळे तो लवकर झोपी गेला किंवा सदा घरी याच्या आत त्याला झोपायचे होते.उगाच वाद नको मानून
अमन गार झोपी गेला होता .सदा घरी आला अमन ला झोपलेले पाहिले तो तसाच दरवाजा मध्ये उभा राहून त्याच्या कडे पाणावलेल्या डोळ्याने पाहत होता.डोळ्या मधून २.४ थेंब अश्रूंचे जमिनीवर पडले