Farmhouse - 7 books and stories free download online pdf in Marathi

फार्महाउस - भाग ७

' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ...

हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती .  माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण वय जरी थांबवता येत नसलं तरी तब्येत सांभाळा येते . त्या दिवशी मंत्री साहेबांचा फोन आला त्यांनी प्रकरण सांगितलं . नाही म्हणायचा विषय नव्हता , कारण मी बऱ्याच अशा केस  सोडवल्या आहेत ज्या सर्वांनी अशक्य म्हणून बंद करून टाकल्या होत्या . मग ही तर किरकोळ केस होती .

मी तपासावर रुजू झालो तेव्हा दोन खून झालेच होते .  तेही एकाच पद्धतीने . मी ज्या दिवशी रुजू झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक खून झाला . मी त्या ठिकाणी पोहोचलो सर्व खोली रक्ताने माखली होती . एक भयानक दुर्गंधी संपूर्ण खोली मध्ये पसरली होती . ज्याचा खून झाला होता त्याच्या शरीरावर मांस शिल्लकच नव्हते .  मागच्या दोन्ही वेळेस असे झाले होते . फॉरेन्सिकचा म्हणण्यानुसार खून करण्यासाठी कोणत्या तरी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वापर केला जात होता . जसं एखाद्या जळवाचा . पण आतापर्यंत दोन्ही ठिकाणी एकही सरपटणारा प्राणी सापडला नव्हता .  मात्र यावेळी त्या माणसाच्या हातात काहीतरी होतं . आम्ही उघडून पाहिलं तर त्याच्या हातात एक गोगलगाय होती .

त्या गोगलगाई ची ही आम्ही तपासणी केली . ती काही वेगळी नव्हती . नेहमी असते तशीच होती . मला कळेच ना की गोगलगायीचा वापर एखादा खून करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो .....? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गोगलगाय आणणार कशा......?

सगळा तपास चालू असताना मला त्याच्या (म्हणजे ज्याचा खून झाला होता तो ) टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडली . ती उघडून बघितली की डायरी पूर्ण कोरी होती .  मला कधीच काही लिहायचा शौक नाही पण त्यादिवशी मला इतकी तीव्र इच्छा झाली की आपण की डायरी लिहायला हवी .  मग मी तिथून चक्क चोरून घरी आली व लिहायला चालू केली

मी पहिल्या दिवशी जरा सविस्तर लिहिले . दुसऱ्या दिवशी फारच तोकडी लिहिली , आणि यावरून मला एक धक्कादायक गोष्ट समजली .

   मी पहिल्या दिवशी मंत्री साहेबाबद्दल लिहिलं होतं . दुसऱ्या दिवशी कळालं की हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला . पण ते साफ खोटं होतं .  मला थोडा तपास करता समजले की त्यांचाही मृत्यू त्याच पद्धतीने झाला होता , आणि ते मुद्दाम लपवलं होतं . ते बरोबरही होतं जितला मंत्री सुरक्षित नाही तिथले लोक कसे सुरक्षित राहतील ..?

   मला मनात एक गोष्ट जाणवली की मुळात आपल्याला लिहायची सवय नाही ती डायरी आल्यापासून आपण लिहायला लागलो .  पहिल्याच दिवशी मी डायरीमध्ये मंत्री साहेबांबरोबर दोघांचा उल्लेख केला होता आणि ज्यांचा उल्लेख केला होता त्याचापैकी एकाचा मृत्यू झाला . पण मला हा योगायोग वाटला म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याची चाचपणी करायची ठरवली . दुसऱ्या दिवशी मी मुद्दामूनच त्रोटक आणि कृत्रिम माहिती लिहिली . त्या माहितीमध्ये मी एका तुरुंगातल्या कैद याबद्दल लिहिलं होतं जी संपूर्णपणे बनावट होती . पण दुसऱ्या दिवशी बरोबर तुरुंगातील एका कैद्याचा मृत्यू झाला .

       मला कळालं नाही किमी तुरुंगातल्या कैद्याला भेटलोच नव्हतो . ही हकिकत बनावट व कृत्रिम होती , तरीही तुरुंगातल्या कैद्याचा मृत्यू का झाला ....? नंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की मी डायरीत ती कृत्रिम हकीकत लिहीत असताना त्याच कैद्याचा विचार करत होतो ज्याचा दुसऱ्या दिवशी खून झाला होता....!

काल रात्री जेव्हा मला या साऱ्यांचा उलगडा झाला तेव्हा मी लिहिलेली पाने काढून बाजूला ठेवली . नंतर मला वाटलं की ती डायरीच जाळून टाकावी ,  पण जेव्हा मी हा सर्व विचार करत होतो माझ्या पुढे ती डायरी मी उघडून ठेवली होती . मी उठलो ती डायरी डस्टबिन मधे टाकली .  मी लाईटर शोधू लागलो , तेव्हाच  तिथे सर्वत्र गोगलगायींचा गराडा पडू लागला . मला वाटतं मी डायरी उघडून तिच्यापुढे बसून सारे विचार केल्यामुळे त्यांना माझे विचार कळाले असावेत त्यामुळे त्यांनी माझा नाश करण्यासाठी गोगलगाईंना पाठवलं असावं असं मला वाटतं .

  मला माहित नाही मी त्या ठिकाणी किती वेळ बेशुद्ध होतो .  नंतर तू मला सोडवलं .  मग मी कसेतरी ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि बेशुद्ध झालो .  मला नंतर कळालं की दवाखान्यातील लोकांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता..  शैला मला म्हणाली की तुला पोलिसांनी पकडलं आहे आणि हे सगळं निस्तारण्यासाठी तुझी गरज आहे . आणि तू निर्दोषही होता म्हणून मी तुला सोडून बाहेर आणलं...

रामचंद्र इंगळे साहेबांचा बोलून झालं होतं त्यांनी प्रश्नाची उत्तरे दिली पण गण्या मात्र अजूनच बुचकळ्यात पडला.....