Manacha Santulan books and stories free download online pdf in Marathi

मनाच संतुलन

मनाचं संतुलन....

अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले.

सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं.त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले, " मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते "

सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे.

मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक?

ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात,
ते ही अगदी शांतपणे !! लिंकन ही असेच !!
सभागृह काय होणार याकडे जीवचा कान आणि डोळ्यात जीव आणून पहात होतं.

प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली , आणि त्याला म्हणाले ,
"सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते, कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं "
" ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते, त्यांच्या हातात जादू आणि कला होती, त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते, आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते,मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय?

कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन.
पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही.

ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!"

सर्व सभागृह बधिर झाल होतं, कोणाला काय बोलाव हे सुचत नव्हतं,अब्राहम लिंकन हि काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या
*प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका,*
*कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या "*
*आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा.*
* आपण होऊन दुसऱ्या ना कधीही दुखवू नका.
आणि
*कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका.*

*"काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते..!!*
'मन' एक माकड आहे. त्या माकडाला आपल्याला ताब्यात ठेवायला पाहिजे. हे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर आपल्याला भरकटत नेते.
त्या साठी अजून ही काय करायला पाहिजे बघूया.
१. राग म्हणजे क्रोध आपल्या ताब्यात ठेवा. कोणावरही कुठल्याही कारणावर चिडू नका. चिडणे,ओरडणे, रागवणे,नंतर भांडण करणे किंवा मारामारी करणे हे सर्व गोष्टी त्याग करणे फार फार आवश्यक आहे, जर आपल्याला मनशांती पाहिजे तर.
२. डोक, मन शांत असलेल्या माणूस कधी भांडण करताना दिसतो काय? नाही ना.
लोक शिव्याशाप देत असेल तर देवूदे, आपण कशाला तसे वागायचे?
३. जितके वेळ शिव्याशाप ऐकतो तितके वेळ देवाची नाम घ्यावे, बाकी सर्व तो बघेल.
*चला खंबीर मनाने प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी सज्ज होऊया......