Navnath Mahatmay - 11 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग ११

नवनाथ महात्म्य भाग ११

पाचवा अवतार ” कानिफनाथ “
===================

श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.

गर्भगिरी डोंगरावरून वाहणाऱ्या पुनागिरी नदीकाठी उंच किल्ल्यावर माधी नावाचे गाव आहे.
आणि इथे या महान संताची समाधी आहे.
या किल्ल्यावर श्री कानिफ नाथ महाराजांनी १७१० मध्ये फाल्गुन महिन्याच्या वैद्य पंचमीला समाधी घेतली.
ईथे लाखो भाविकांची श्रद्धा आहे.

असे मानले जाते की ब्रह्मदेव एके दिवशी सरस्वतीकडे आकर्षित झाले जेव्हा त्यांचे वीर्य खाली पडले, ते हवेत उडून हिमाचल प्रदेशात भटकत असलेल्या हत्तीच्या कानात गेले .
काही काळानंतर प्रबोधनरन यांनी त्यांना जालंधरनाथच्या आदेशानुसार कानावर जाण्याची सूचना केली आणि त्यामुळे त्याचे नाव कानिफ नाथ ठेवले गेले.

कानिफ नाथ महाराजांनी बद्रीनाथ येथील भागीरथी नदीच्या काठावर 12 वर्षे तपस्या केल्या व अनेक वर्षे जंगलात घालवून योगासने केली.
त्यानंतर त्यांनी आपल्या शिकवणीतुन दडपलेल्या दलितांच्या भक्तीच्या मार्गावर दया दाखवली.

दलितांचे दु: ख कमी करण्यासाठी या विषयावर त्यांनी साबरी भाषेत अनेक कवने केली.
असे म्हणतात की या रचनांच्या गायनामुळे रुग्णांच्या आजारांवर उपचार सुरू झाले आणि आजारात सुधारणा दिसू लागली .
आजही लोक त्यांच्या दु: खापासून मुक्त होण्यासाठी महाराजांच्या दारात येतात.

नालि पंथात सामील होण्यासाठी दालिबाई नावाच्या महिलेने कानिफनाथ महाराजांची कठोर तपश्चर्या केली.
फाल्गुन अमावस्येच्या दिवशी दालीबाईंनी समाधी घेतली.
समाधी घेताना कानिफनाथ स्वत: शिष्याकडे प्रकट झाले .
त्याच समाधीवर एक डाळिंबाचे झाड वाढले.
या झाडावर रंगीत धागा बांधला असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे.

अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे.
पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे.
मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे.
कानिफनाथ गड

हा गड तसा उंचीवरचा आणि रस्ता वळणावळणाचा
मुख्य मंदिर हे गडाच्या सर्वोच्च उंचीवर असून आजूबाजूचा सर्व परिसर येथून सहज दिसतो.
मंदिराचे बांधकाम आताच्याच काळातले आहे.
भव्य मंडप, आजूबाजूला मोकळी जागा आणि अत्यंत सुंदर आणि महत्वाचे म्हणजे स्वच्छ परिसर हे या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य. गाभाऱ्यात जाण्यासाठी एक फारच अरुंद चौकोनी खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या आत एक भव्य गाभारा असून आता ८ ते १० माणसे सहज मावतील एवढी जागा आहे.
मात्र गाभाऱ्यातून आत जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी माणसाला सरपटत जावे लागते.
गाभाऱ्यात फक्त पुरुष भक्तांनाच प्रवेश आहे आणि तो सुद्धा शर्ट काढूनच.
स्त्रियांना फक्त पादुकांचे दर्शन घेण्याची परवानगी आहे.

परिसरात मुख्य मंदिरा बरोबरच इतर अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच गडावर एक अप्रतिम शिल्पही बसवले आहे, ते शिल्प म्हणजे कानिफनाथाच्या जन्माचा देखावा.

श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे.
नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे.
तेथे नाथ विश्रांती करतात .
समोरच एक होमकुंड आहे .
नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे.
त्यातील भगवान विष्णूची मूर्ती इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही.
इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे जणू काही श्री मोहनीराजच तेथे अवतरल्यासारखे वाटतात .
मंदिराशेजारीच श्री हनुमंतरायाची मुर्ती आहे.
ती मुर्ती भक्तांनी प्रभुकार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश देते.
नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्र्नाथ यांचे मंदिर आहे.
तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्र्नाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते.
समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे.
जेथे जाण्याकरीता भुयार आहे.
हे भुयार पूर्वीच्या स्थापत्यशात्राचा एक आदर्श नमूना आहे.
त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे .व तेथे असलेल्या खिडकीमधून गावाची पश्मिमेकडील भाग दिसतो .
विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे.
समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबाचे झाड आहे.
त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डालीबाईच्या नावाने संबोधतात.
त्या डाळींबाच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करुन नाडा(धागा) बांधतात .
श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात.
श्री समाधी मंदिरामध्ये श्री नाथांची संजीवन समाधी असून, श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मुर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मुर्ती आहे.
तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे.

मढी गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर अतिशय प्रसिध्द आहे.
त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ, श्री दत्त यांचे मंदिरदेखील आहे.
मढी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे.
तेथे नाथ भक्त आवर्जुन भेट देतात.
नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे.
त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे.
त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापुरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे.
या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे.
त्याला “लहान मायबा” या नावाने संबोधतात त्याच प्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत.
त्यांमध्ये एक दर्या आहे.
त्याला लेण्यार्दच्या दरा म्हणतात.
लेण्यार्दच्या दर्याशेजारीच दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पुजा होते.
तसेच या दर्यामध्ये एक ३ ते ४ मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे.
या झ्ऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहाण्याजोगा असतो.
तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे.

कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले.
धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले.
नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्हातील मढी या गावी फाल्गुन वद्य(रंगपंचंमी) च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली.
कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे.
राणी येसूबाई आणि बाळराजे शाहुमहाराज(पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते.
तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथस नवस केला होता कि, जर माझ्या शाहुमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभा मंडप, नगारखाना इ. बांधकाम करेन तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन.
पाच दिवसांच्या आत राणी येसुबाई आणि युवराज शाहुराजे(पहिले) यांची मोंगलांनी सुखरुप सुटका केली.
ही सारी कृपा कानिफनाथांची आहे अशा श्रद्धेने हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई आणि शाहुराजे (पहिले) यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले.
तसेच चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदीक पध्द्तीने पूजा व्हावी म्हणून आणि फाल्गुन वद्य ५ (रंगपंचमी) या दिवशी भरणाऱ्या यात्रेची सर्व व्यवस्था व्हावी म्हणून छ्त्रपती शाहू महाराजांनी वेद्शास्त्र संपन्न ब्राम्हण श्री गंगाराम दिक्षित उपनान चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना इ.स. १७४३ मध्ये सनद दिली .

समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप सुप्रसिध्द मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे.
अशाप्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडास ऐतिहासीक महत्त्व प्राप्त झाले आहे .

फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमी ) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते.
या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात.
अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे.
तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो.
पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिध्द आहे.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो.
पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.

क्रमशः

.