Vibhajan - 7 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 7

विभाजन

(कादंबरी)

(7)

धुळ्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील तीन भावांनी देशसेवेसाठी होतात्म पत्करले. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला.

१९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाड;मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मैझीनी या सुप्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्मृती चरित्र लिहिले. अठराशे सत्तावनचा उठाव हे भारतीय स्वातंत्र्य होते असे त्यांचे प्रतिपादन करणारा अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

पन्नास वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. ते तिथे दहा वर्षे होते. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव लिहून ठेवले. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरीत स्थानबद्द केले. तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण इत्यादी सामाजिक चळवळी केल्या. थोर साहित्यिक होते. १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेच्या बदला घेण्यासाठी अनंत कान्हेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जंक्शन यांचा वध केला. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. याचा संबंध सरकारने स्वतंत्र वीर सावरकरांची जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा फर्मावली.

बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्तचर संघटना स्थापन करू लागले. ब्रिटीस अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारच्या लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे हे प्रमुख उद्दिष्ट होते.

बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतीकारी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समिती च्या पाचशेच्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांच्या मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. कोलकताजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.

१९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. परंतू ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला. ती गाडी त्यांची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. मग इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समिती च्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आलीे. अरविंद भाऊ चा संबंध बॉम्ब तयार करण्याची जोडण्यात आला. पण ते सिद्ध करण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.

सचिंद्रनाथ संन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हाईसराय लार्ड हार्डींग्जवर बाँब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व सहका-यांनी केले. पण हार्डींग्ज बचावला.

भारतातील मद्रास प्रांतात क्रांतिकारी चालू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकांनी अँश या अधिकार्‍यांना ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून साहाय्य मिळत असे. इंग्लंड येथील इंडिया हाऊस हे अशा प्रकारचे महत्त्वाचे केंद्र होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाउस ची स्थापना केली होती. त्या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. इंडीया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा. ह्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍यांना ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आले.

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली. ब्रिटीशांच्या शत्रूंची भेट घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल, असे वाटत होते. भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या. गदर ही त्यातील प्रमुख संघटना होती. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेचे मुख्य प्रपत्र होते. या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत. भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाई. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला.

ब्रिटीशां विरुद्ध उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाब मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. लष्करा मधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. पण फितुरांमुळे ब्रिटीशांना या योजनेच्या सुगावा लागला. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडला. त्यांना फाशी देण्यात आली. रास बिहारी बोस मात्र निश्चित होऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.

युद्धकाळात परदेशात इतरही क्रांतिकारी चळवळी कार्यरत होत्या. बर्लिनमध्ये वीरेंद्र नाथ उपाध्याय, भूपेंद्र दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटीस विरोधी योजना आखल्या. १९१५ मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबी तुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती.

सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली होती. गांधीजींनी चळवळ स्थगित केल्यानंतर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ संन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमा होण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. याला काकोरी कट असे म्हणतात. सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले. त्यांच्यावर खटले चालवण्यात अाले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आजाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत.

समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आजाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. ते सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारांचेच होते. १९२८ साली दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगारांचे शोषण करणारी सामाजिक आर्थिक व्यवस्था उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले.

शस्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या सर्व स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. विभागाचे नाव होते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आजाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.

नागरी हक्कांची पायमल्ली करणारे दोन विधेयके या वेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केलीत. त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्ब फेकले. सरकारने तात्काळ हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या केंद्रावर धाडी घातल्या. त्यातून साँडर्सच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. सरकारने क्रांतिकारकाचीे धरपकड सुरू केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. मात्र चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले.

सूर्यसेन हे बंगालमधील चिंचगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार अशा निष्ठावान क्रांतिकारकाची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने आडगाव येथील शस्त्रागार हल्ल्याची योजना त्यांनी आखली. योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावंमधील दोन घरातील शस्त्रास्त्र ताब्यात घेतली. टेलिफोन यंत्रणा त्यानी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटीशांना धडक दिली. १६ फेब्रुवारी १९३३ रोजी सूर्यसेन व त्यांचे सहकारी सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सुर्यसेन व त्याच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार ने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. त्यामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष, सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशांना ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नर वरच गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या. जालियन वाला बाग हत्याकांड याला जबाबदार असणाऱ्या ओडवायरचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये १९४० साली केला.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले. क्रांती कारकांनी ब्रिटीश सत्तेशी लढताना साहस आणि निर्धाराचे जे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पणवृत्ती केवळ अजोड होती. त्यांचे बलिदान भारतीयांना स्फुर्तीदायी ठरले आहे. याचाच परिणाम मोहम्मदवर झाला होता. मोहम्मदही याच क्रांतीवीरांच्या त्यागानं व बलिदानानं भारावला होता. त्यामुळं की काय, त्यानं १९४२ च्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.

मोहम्मदला राष्ट्रीय सभेची भुमिका आवडत होती. राष्ट्रीय सभा ही हिंदू मुसलमान याचं वेगळं राष्ट्र व्हावं असं मानत नव्हती. १९४२ च्या चलेजावच्या उठावात मुस्लिम लीगचं सहभाग न घेणं तसेच हिंदू महासभेचं भाग न घेणं त्याला आवडलं नव्हतं. त्यानं मात्र गांधीजीच्या म्हणण्यानुसार चलेजावच्या आंदोलनात भाग घेतला होता.

चलेजावच्या आंदोलनात लोकं तारा तोडत होते. पोलिस ठाणे जाळत होते. हे त्याला आवडत नव्हते. त्याला वाटत होते की राष्ट्रीय सभेनं अहिंसक मार्गानं आंदोलन करावं. पण अहिंसक मार्गानं आंदोलन होणार कसं. कारण राष्ट्रीय सभेनं चलेजाव भारत छोडोचं आंदोलन छेडताच राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. मग जनता संतप्त झाली. संतप्त जनतेनं जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी या शांततामय मिरवणुकांवर लाठीहल्ले केले आणि गोळीबार केला. त्यामुळं जनता चिडली. म्हणून त्यांनी तारा तोडल्या.

मोहम्मदनेही पोलिसस्टेशनला लावलेल्या टेलिफोनच्या तारा तोडण्यात सहभागी झाला होता. याची जेव्हा माहीती त्या पोलिसस्टेशनला झाली. तेव्हा तेही धरपकड करायला पुढे आली. ते रोजचे त्याला पकडायला येवू लागले. पण मोहम्मदने पोलिस पकडून नेतील या धाकानं लपत होता. कधी बेशरमच्या झाडातही लपत होता. तर कधी कोणाच्या घरात. पोलिसही काही त्याचा पिच्छा सोडत नव्हते. ते प्रत्येकाचं घर तपासत होते. लोकांनी लपवलेल्या गोष्टीची शंका घेवून लोकांना मारत होते.