Ramacha shela..- 4 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 4

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

४. आई गेली

आई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा असे द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या आजारी पडल्या. आपल्या खोलीत त्या आता पडून असत. स्वत:च थोडी भाकरी करून खात. परंतु दिवसेंदिवस त्यांना अधिक अशक्त वाटू लागले. तापही येई. ग्लानी येई. त्यांनी भावाला बोलावून घेतले. भाऊ आला होता. पोलिस खात्यातील भाऊ. परंतु प्रेमाने सारे बहिणीचे करीत होता. एके दिवशी द्वारकाबाई भावाला म्हणाल्या, “भाऊ, उदयची उद्या परीक्षा संपायची होती. आता त्याला पत्र पाठव. इतके दिवस त्याला आपण कळविले नाही. परंतु त्याला आता कळव. म्हणावे लवकर ये. माझा भरवसा नाही.”

आणि मामाने त्याप्रमाणे उदयला कळविले. परंतु उदय आला नाही. ती माऊली वाट पाहात होती.

“नाही का रे आला उदय? त्याचे पत्र तरी?”

“तोही नाही व पत्रही नाही.”

“परीक्षा संपून कोठे गेला की काय? परीक्षेची उत्तरे चांगली गेली नाहीत की काय? वाईट वाटल्यामुळे आला नाही की काय? का बरे आला नाही? उद्या तार तरी कर. एकदा भेटू दे. मी जगेनसे वाटत नाही. एकदा शेवटचे त्याला डोळे भरून पाहीन.

द्वारकाबाईना सारखा उदय दिसत होता. त्याच्या आठवणी त्यांना येत होत्या. कोणी आले की, उदयच्या आठवणी त्या सांगू लागत. आणि दिवसातून शंभरदा त्यांच्या डोळयांतून पाणी येई. एके दिवशी त्यांची मालकीण त्यांच्या समाचाराला आली होती.

“कसे वाटते द्वारकाबाई?”

“या बसा. तुम्ही कशाला आल्यात? येथे बसायलासुध्दा नीट जागा नाही. तो पाट घ्या. बसा.”
“जरा बरे वाटते का?”

“जीव आत ओढतो आहे. मी जगेनसे नाही वाटत. प्राण कंठात गोळा होत आहे असे वाटते. घाबरल्यासारखे वाटते. एकदा उदय आला म्हणजे झाले.”

“त्याची परीक्षा झाली ना?”

“हो, खरे म्हणजे यायचा.”

“ही अलीकडची मुले. त्यांना काही वाटत नाही. परीक्षा संपली. चार दिवस चैन करून येईल. नाटक-सिनेमा पाहील. मित्र असतात. मोह पाडतात.”

“उदय तसा नाही. त्याच्याजवळ कोठे आहेत पैसे? तो चहा पीत नाही, दूध घेत नाही, सिगारेट ओढीत नाही. कोठून पाहील सिनेमा? गरीब आईचा तो मुलगा.”

“नली म्हणत होती खरी, की उदय चहासुध्दा पीत नाही म्हणून. आमच्या नलीला तुमच्या उदयचे भारी वेड.”

“ती आली का?”

“हो आली. यंदा तिची परीक्षा नव्हती. बंडू मात्र तिकडेच महाबळेश्वरला गेला आहे. तुम्हांला काही हवे का?”
“काही नको. भाऊ आला आहे. तो सारे करतो. उद्या माझे बरेवाईट झाले तर उदयला सांभाळा. त्याचे शिक्षण झालेच आहे. परंतु नापास झाला तर? त्याला थोडी मदत करा. तो आपण होऊन मागणार नाही. मोठा स्वाभिमानी. लहानपणी तुमच्याकडून कोट आणला होता, तो त्याने घातला नाही. त्या दिवशी त्याला किती मी मारले. गरीब आहे हो उदय.” असे म्हणता म्हणता त्या मातेच्या डोळयांत पाणी आले.

“उगी. रडू नका. उदय चांगला होईल. तुम्ही बर्‍या व्हाल. आज ना उद्या येईल. तो आला की, तुमचा आजार एकदम बरा होईल. नका रडू. मुलगा उद्या नोकरीला लागेल. तुमचे कष्ट संपतील. सुखात राहाल.”

“बाळासाठी कष्ट करीत होत्ये. ते कष्ट नसत हो वाटत. आनंदच वाटे आणखी दोन हात असते तर आणखी काम केले असते. त्याला थोडे अधिक पैसे पाठविले असते. थोडे दूध घेता. उदय दिसतो कसा? उंच, गोरा. आणि त्याचे डोळे तुम्ही पाहिले आहेत का? त्याच्या वडिलांचे डोळे असेच होते. ते डोळे पाहण्यासाठी पुन:पुन्हा जन्म घ्यावा. उदयच्या अंगावर थोडे मांस हवे होते. राजबिंडा दिसला असता. परंतु कोठून आणू दूध-तूप?”

“आमची नली उदयच्या डोळयांचे वर्णन करीत असते. तिने तुमच्या उदयला दोन पत्रेही मुंबईहून पाठविली होती. त्याच्या डोळयांवर तिने कविता केल्या होत्या, सांगत होती.”

“तुमची नली हुशार आहे.”

“तिचे यंदा लग्न करावयाचे म्हणत आहोत.”

“परंतु आणखी एक वर्ष शिकवणार ना?”

“चांगले स्थळ मिळाले तर कशाला शिकवायचे? एका जहागीरदाराचा मुलगा आहे. जमेल असे वाटते. तुम्ही बर्‍या व्हा. नलीच्या लग्नात तुम्ही हव्यात. उदयही येईल.”

“माझी नाही हो आशा. नलू चांगल्या घरी पडो. अशा नक्षत्रासारख्या मुलीला कोण करणार नाही? आणि पुन्हा शिकलेली. ज्याला मिळेल तो भाग्यवान.”

“तुमच्या उदयचे सुध्दा लग्न करायला हवे. सूनमुख पाहा. नातू मांडीवर खेळवा. सुखाचे दिवस पाहा. मग डोळे मिटा. तोवर जगा. उगीच वेडेवाकडे मनात आणीत नका जाऊ. समजलात ना? काही लागले-सरवले कळवीत जा. थोडा मुरावळा पाठवू का?

“काही नको. राम राम म्हणत पडून राहीन. औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरि: दुसरे आता काही नको. नाशिकला असत्ये तर गंगातीरी मरण आले असते. परंतु नाही नशिबी.”

मालकीणबाई निघून गेल्या. द्वारकाबाईना खूप शीण वाटला. डोळे मिळून त्या पडून राहिल्या.
रात्री त्यांना एकाएकी वात आला.

“उदय, येरे लवकर. अरे बाहेर ऊन आहे. छत्री घ्यावी. आईचे ऐकावे बाळ. झाली ना परीक्षा. ये आता. आता आईला मांडी द्यायला ये. भाऊ बघ उदय आला. असा दु:खी का तो? त्याला कसले वाईट वाटते आहे? उदय, मी तुला सोडून जाणार म्हणून का रडतो आहेस? अरे देव सर्वांना आहे. ये. बस जवळ. वाळलास हो. परीक्षेचा त्रास. जागरणे केली असशील? ये, बस जवळ. भाऊ आण रे त्याला जवळ. नाही येत? गेला, कोठे गेला? कोणी नेले त्याला ओढून? आईच्यापेक्षा त्याच्यावर कोणाचा हक्क? भाऊ, जा रे त्याला आण. कोण नेत असेल त्याच्या हातून त्याला सोडवून आण. आपल्याला नली नको. श्रीमंताची मुलगी नको. तुला का नली हवी आहे? तिला तुझे डोळे आवडतात. परंतु तिचे लग्न ठरले राजा. आपण गरीब आहोत. हसला. भाऊ, तो बघ हसला. लग्नाची गोष्ट काढताच बघा गुलाम हसला. आईला कंटाळलास का रे? आणू हो नवी नवरी. सूनमुख पाहीन. तुझे वडील असते तर ! असे नसते हो हाल झाले ! मला नाही हो तुला सुखात ठेवता आले.

भाऊ, अरे, उदय बुडतो आहे. त्या बघ लाटा. अरे, त्याला वाचव. तो बघ पूर वाढतो आहे. लोंढा येत आहे. पोहता येत नाही. कशाला उडी घेतलीस? अरेरे ! वाचवा रे कोणी.

उदय, वाचलास? ये.ये. असा कोठे उडी नको घेऊस. जपून रहा राजा. आईची तू आशा. खरे ना?”

असे ती माउली कितीतरी सारखे वातात बोलत होती. भाऊ जवळ बसून होता. एखादे वेळेस ती माता एकदम उठू पाही. भाऊ तिला आवरी. रात्र संपत आली. पहाटेचा थंड वारा आला. द्वारकाबाई थकल्या. त्यांना का झोप लागली? आणि आता उजाडले.

“भाऊ.”

“काय ताई? काय हवे?”

“काही नको. उदय आला का?”

“आज येईल.”

“तार केलीस का?”

“नाही.”

“तार कर रे. होऊ दे रूपया खर्च. एवढे माझे प्राण जाणार आहेत तेथे रूपयाचे काय घेऊन बसलास? आज तार कर. भरपूर पैशांची मोठी तार कर.”

“करतो हो.”

“आज तार केलीस म्हणजे केव्हा पोचेल?”

“दुपारी पोचेल. तो लगेच निघाला तर उद्या पहाटे येईल.”

“उद्या गुरूवार ना?”

“गुरूवार, एकादशी.”

“वा ! छान वार आहे. उदयचे वडील एकादशीसच वारले. जा तार कर.”
मामाने भाच्यास तार केली. त्या वेळेस भाचा निघण्याच्याच तयारीत होता.

उदय गाडीत बसला. सरला परत गेली. गाडी जात होती आणि उदयचे विचारही सर्वत्र धावत होते. मध्येच त्याचे तोंड फुले, मध्येच ते खिन्न होई. आई भेटेल, ती बरी होईल, तिला मी सुखवीन असे मनात येऊन तो आनंदे. परंतु एखादे वेळी आई देवाघरी गेली तर नसेल असे मनात येऊन त्याला धक्का बसे. पत्र येताक्षणीच आपण निघाले पाहिजे होते. प्रेमसिंधू आई ! तिने माझ्यासाठी आज वीसबावीस वर्षे किती खस्ता काढल्या, किती श्रम केले ! किती तिचे उपकार ! किती तिची माया ! आणि ती आजारी आहे असे कळूनही मी ताबडतोब गेलो नाही. परीक्षा संपली होती तरी गेलो नाही. माझी परीक्षा बुडू नये म्हणून तिने आधी कळवले नसेल. काळजी वाटू नये म्हणून तार केली नसेल. परंतु आई नक्की आजारी असेल, बरीच आजारी असेल म्हणून मामा आले. आणि मी? सरलेच्या प्रेमपाशात होतो. चार दिवस आणखी राहिलो. सरले, आई जर भेटली नाही तर? आपण दोघे अपराधी ठरू. नाही का भेटणार आई, का ती मुलाला सोडून जाईल? मुलाला आता आपली काय जरूर? त्याला अधिक प्रेमाचे माणूस भेटले आहे असे तर तिच्या आत्म्यास नसेल कळले? आणि सरलेच्या प्रेमात मी रंगलो आहे असे दिसल्यामुळेच तर ती निघून नसेल ना जात? प्रेम शुध्द आहे का? आईला काय वाटेल? आमचे अद्यापि लग्न नाही. आधी आम्ही लग्न का लावले नाही? लग्न लावून मग परस्परांशी संबंध का नाही ठेवला? एकदम कायदेशीर पतिपत्नी म्हणून का नाही झालो? सरला अधीर होती. ती निराश होती. आणि एकदम लग्न लावून आम्ही कोठे राहणार? परंतु कोठे राहावयाचे ही फिकीर होती तर आणखी काही दिवस दुरूनच प्रेम नको होते का घ्यायला? आमचे का चुकले? परंतु आम्ही एकमेकांस अंतर थोडेच देणार आहोत? मी तिला काही फसवणार नाही. आम्ही एकमेकांची आहोत. देवाला माहीत आहे. आमचे खरेच लग्न लागलेले आहे. हृदयाच्या वेदनांनी व भावनांनी लावलेले लग्न. अश्रूंनी व स्मितांनी लावलेले लग्न. मी तिला फसवणार असेन तर ते करणे पाप आहे. परंतु सरलेला मी फसवणार नाही. अशा प्रेमळ व हळुवार हृदयाच्या मुलीस कोण फसवील? निराशा व दु:ख यांनी पोळून होरपळून ती निघाली होती. म्हणे “माझी ही पहिली दिवाळी.” तिच्या जीवनात लागलेला प्रेमाचा हा पहिला दीप. तो का अमंगळ आहे. पापरूप आहे?

आई, तुला मी सारे सांगेन. तू का रागावशील? स्त्रीहृदयाची तुलाही नाही का कल्पना येणार? तू आशीर्वाद देशील, का तोंड नको दाखवू असे म्हणशील? काय करशील तू? आई, तू आई आहेस. तुला रूचले नाही तरीही तू आशीर्वाद देशील. देव-धर्म रागावतील. परंतु माता रागावणार नाही.

उदय अशा निरनिराळया विचारस्थितींतून जात होता. जीवनाकडे निरनिराळया दृष्टींनी पाहात होता. मध्येच तो कविहृदयाचा होई. सारे त्याला रमणीय वाटे. सरलेचे अश्रू त्याला आठवत. ते पावसातील भिजणे त्याला आठवे. तो रूमाल व त्यावरची ती पाखरे ! त्याच्या डोळयांसमोर सारे येई व तो कौतुकाच्या, स्नेहाच्या, सौंदर्याच्या भावनांवर नाचे. तो मध्येच संतवृत्तीचा होई. त्याला सारे सुंदर व मंगलच मग दिसे. संताला सर्वत्र मांगल्य दिसते. आणि मध्येच तो वीरवृत्तीचा होई. संकटे आली तर झगडू. आपण बहिष्कृत झालो तर? आईने मला दूर केले, सरलेला तिच्या पित्याने हाकलून दिले तर? काही हरकत नाही. आम्ही निर्भयपणे व निर्मळ मनाने नांदू. टीकांना जुमानणार नाही. परंतु त्याची ती कविवृत्ती, ती संतवृत्ती, ती वीरवृत्ती त्या सार्‍या लुप्त होत. आणि मग त्यांच्या दृष्टीला सारे कुरूप व हीन दिसू लागे. “कसले काव्य नि कसले काय ! कसली प्रेमाची दिव्यता व मधुरता ! आम्ही जणू भोगी किडे बनलो. सारासार विवेक बाजूला ठेवला. वासनांचे गुलाम बनून आम्ही परस्परांस मिठया मारल्या. आम्ही खोल गर्तेत पडलो. चिखलात बरबटलो.” आणि असे विचार मनात आले म्हणजे तो कावरा-बावरा होई. खरेच का आपण नि:सार आहोत? सरलेच्या व माझ्या प्रेमात केवळ का विषयताच आहे? त्या प्रेमात आसक्ती असेल; परंतु केवळ का आसक्तीच आहे? तेथे उदारता, सहानुभूती, त्याग, एकमेकांत मिळून जाण्याची वृत्ती हे नाही का? यांना का काही अर्थ नाही? सायंकाळच्या निर्मळ प्रकाशापेक्षा काळया मलिन ढगांवर पडलेला प्रकाश अधिकच सुंदर दिसतो. आसक्तीच्या मलिन पार्श्वभूमीवरील प्रेम हे रमणीयतर आहे. सारे आरंभ क्षुद्र असतात. परंतु त्यांतूनच पुढे महनीयताही प्रकट होते. या आसक्तिमय प्रेमातूनच विशुध्द प्रेमाचा संभव होईल.

माझ्या जीवना ! तुझा मी तिरस्कार करीत नाही. तुझ्यातील भल्या-बुर्‍याला मला मिठी मारूदे. सारे चाखू दे. पाहू दे. हे सारे माझे आहे. वासना माझ्या. विचार माझे. मांगल्य माझे. सर्वांचा मला समन्वय करू दे. अविरोध करू दे. उदय, असा गांगरून नको जाऊस. जे जे तुझ्यात आहे, त्याचा मेळ घालायला शीक. सर्वांना नीट जागा दे. घाबरू नकोस.

अशा विचारात उदय होता. त्याने ट्रंकेतून एक पुस्तक काढले. त्याला का वाचायचे होते? त्या पुस्तकात काही तरी होते. ते तो पाहात होता. काय होते त्यात? तेथे सरलेचा व त्याचा फोटो होता. त्या फोटोकडे तो पाहात होता. आणि त्याने डोळे मिटले. आईचा फोटो हवा काढायला. मायलेकरांचा फोटो. परंतु आई असेल का? गेली असली तर? मग कोठला फोटो? परंतु आई असेल. या बाळाला, तिच्या लाडक्या उदयला आशीर्वाद दिल्याशिवाय ती जाणार नाही. असे विचारकल्लोळ उठत होते. नि कल्याण स्टेशन आले, तो उतरला. तो त्याला तेथे कोण दिसले? ज्यांच्याकडे आई स्वयंपाक करी त्यांच्याकडील ती सारी मंडळी तेथे होती. बंडू होता, नली होती, त्यांची आई होती, त्यांचे वडील होते. इतर मंडळी, गडीमाणसे, सारी होती.

“काय रे उदय?” बंडूने विचारले.

“तुम्ही कोठे चाललात सारी?” त्याने विचारले.

“नलीच्या लग्नाला.”

“माझी आई कशी आहे?”

“अत्यवस्थ आहे. माझी आई परवा भेटून आली होती. तुझी आई सारखी तुझी आठवण काढीत आहे.

“उदय, आई आजारी होती तरी कोठे रे होतास?”

“मी माझे लग्न लावीत होतो.”

“उदय, थट्टा काय करतोस?”

“नलू, श्रीमंतांची लग्ने जमतात व गरिबांची जमत नाहीत वाटते?”

“तुझ्या डोळयांवर केलेली कविता तुला आवडली का?”

“मी ती फाडून टाकली.”

“का?”

“माझ्या डोळयांवर कविता करण्याचा हक्क तुला नाही.”

“मग कोणाला?”

“सरलेला.”

“कोण रे ही सरला? तुझी बायको वाटते? लग्न मनात लागले की जनात?”

“मनात लागले. जनातही लागल्यासारखे आहे.”

“नलू, चल; तिकडे बाबा बोलावीत आहेत.”

नलू व बंडू निघून गेली. उदय तेथेच होता. त्याची गाडी लगेच येणार होती.

ती पाहा आलीच भुसावळकडे जाणारी गाडी. गर्दी झाली. उदय डब्यात शिरला. ती पाहा नली आली. धावत आली.

“उदय, उदय !”

“काय?”

“ही घे चिठ्ठी, आपली पुन्हा भेट होणार नाही. तुझी आई दोन दिवसांची सोबती ! मग तू कोठे जाशील? मी कोठे असेन? परंतु कोठेही असलो तरी कधीमधी एकमेकांस आठवू. तुझ्या डोळयांवर मी कविता करीत राहीन. त्याचा राग नको मानू. मी तुला न कळता दुरुन हा हक्क बजावीन. जा, सुखी हो. आई भेटो.”

शिट्टी झाली, गाडी निघाली. नली उभी होती, ती आता दिसेनाशी झाली. उदयने ती चिठ्ठी वाचली. काय होते तीत?

“उदय,

“उदय तसा नाही. त्याच्याजवळ कोठे आहेत पैसे? तो चहा पीत नाही, दूध घेत नाही, सिगारेट ओढीत नाही. कोठून पाहील सिनेमा? गरीब आईचा तो मुलगा.”

“नली म्हणत होती खरी, की उदय चहासुध्दा पीत नाही म्हणून. आमच्या नलीला तुमच्या उदयचे भारी वेड.”

“ती आली का?”

“हो आली. यंदा तिची परीक्षा नव्हती. बंडू मात्र तिकडेच महाबळेश्वरला गेला आहे. तुम्हांला काही हवे का?”
“काही नको. भाऊ आला आहे. तो सारे करतो. उद्या माझे बरेवाईट झाले तर उदयला सांभाळा. त्याचे शिक्षण झालेच आहे. परंतु नापास झाला तर? त्याला थोडी मदत करा. तो आपण होऊन मागणार नाही. मोठा स्वाभिमानी. लहानपणी तुमच्याकडून कोट आणला होता, तो त्याने घातला नाही. त्या दिवशी त्याला किती मी मारले. गरीब आहे हो उदय.” असे म्हणता म्हणता त्या मातेच्या डोळयांत पाणी आले.

“उगी. रडू नका. उदय चांगला होईल. तुम्ही बर्‍या व्हाल. आज ना उद्या येईल. तो आला की, तुमचा आजार एकदम बरा होईल. नका रडू. मुलगा उद्या नोकरीला लागेल. तुमचे कष्ट संपतील. सुखात राहाल.”

“बाळासाठी कष्ट करीत होत्ये. ते कष्ट नसत हो वाटत. आनंदच वाटे आणखी दोन हात असते तर आणखी काम केले असते. त्याला थोडे अधिक पैसे पाठविले असते. थोडे दूध घेता. उदय दिसतो कसा? उंच, गोरा. आणि त्याचे डोळे तुम्ही पाहिले आहेत का? त्याच्या वडिलांचे डोळे असेच होते. ते डोळे पाहण्यासाठी पुन:पुन्हा जन्म घ्यावा. उदयच्या अंगावर थोडे मांस हवे होते. राजबिंडा दिसला असता. परंतु कोठून आणू दूध-तूप?”

“आमची नली उदयच्या डोळयांचे वर्णन करीत असते. तिने तुमच्या उदयला दोन पत्रेही मुंबईहून पाठविली होती. त्याच्या डोळयांवर तिने कविता केल्या होत्या, सांगत होती.”

“तुमची नली हुशार आहे.”

“तिचे यंदा लग्न करावयाचे म्हणत आहोत.”

“परंतु आणखी एक वर्ष शिकवणार ना?”

“चांगले स्थळ मिळाले तर कशाला शिकवायचे? एका जहागीरदाराचा मुलगा आहे. जमेल असे वाटते. तुम्ही बर्‍या व्हा. नलीच्या लग्नात तुम्ही हव्यात. उदयही येईल.”

“माझी नाही हो आशा. नलू चांगल्या घरी पडो. अशा नक्षत्रासारख्या मुलीला कोण करणार नाही? आणि पुन्हा शिकलेली. ज्याला मिळेल तो भाग्यवान.”

“तुमच्या उदयचे सुध्दा लग्न करायला हवे. सूनमुख पाहा. नातू मांडीवर खेळवा. सुखाचे दिवस पाहा. मग डोळे मिटा. तोवर जगा. उगीच वेडेवाकडे मनात आणीत नका जाऊ. समजलात ना? काही लागले-सरवले कळवीत जा. थोडा मुरावळा पाठवू का?

“काही नको. राम राम म्हणत पडून राहीन. औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरि: दुसरे आता काही नको. नाशिकला असत्ये तर गंगातीरी मरण आले असते. परंतु नाही नशिबी.”

मालकीणबाई निघून गेल्या. द्वारकाबाईना खूप शीण वाटला. डोळे मिळून त्या पडून राहिल्या.
रात्री त्यांना एकाएकी वात आला.

“उदय, येरे लवकर. अरे बाहेर ऊन आहे. छत्री घ्यावी. आईचे ऐकावे बाळ. झाली ना परीक्षा. ये आता. आता आईला मांडी द्यायला ये. भाऊ बघ उदय आला. असा दु:खी का तो? त्याला कसले वाईट वाटते आहे? उदय, मी तुला सोडून जाणार म्हणून का रडतो आहेस? अरे देव सर्वांना आहे. ये. बस जवळ. वाळलास हो. परीक्षेचा त्रास. जागरणे केली असशील? ये, बस जवळ. भाऊ आण रे त्याला जवळ. नाही येत? गेला, कोठे गेला? कोणी नेले त्याला ओढून? आईच्यापेक्षा त्याच्यावर कोणाचा हक्क? भाऊ, जा रे त्याला आण. कोण नेत असेल त्याच्या हातून त्याला सोडवून आण. आपल्याला नली नको. श्रीमंताची मुलगी नको. तुला का नली हवी आहे? तिला तुझे डोळे आवडतात. परंतु तिचे लग्न ठरले राजा. आपण गरीब आहोत. हसला. भाऊ, तो बघ हसला. लग्नाची गोष्ट काढताच बघा गुलाम हसला. आईला कंटाळलास का रे? आणू हो नवी नवरी. सूनमुख पाहीन. तुझे वडील असते तर ! असे नसते हो हाल झाले ! मला नाही हो तुला सुखात ठेवता आले.

भाऊ, अरे, उदय बुडतो आहे. त्या बघ लाटा. अरे, त्याला वाचव. तो बघ पूर वाढतो आहे. लोंढा येत आहे. पोहता येत नाही. कशाला उडी घेतलीस? अरेरे ! वाचवा रे कोणी.

उदय, वाचलास? ये.ये. असा कोठे उडी नको घेऊस. जपून रहा राजा. आईची तू आशा. खरे ना?”

असे ती माउली कितीतरी सारखे वातात बोलत होती. भाऊ जवळ बसून होता. एखादे वेळेस ती माता एकदम उठू पाही. भाऊ तिला आवरी. रात्र संपत आली. पहाटेचा थंड वारा आला. द्वारकाबाई थकल्या. त्यांना का झोप लागली? आणि आता उजाडले.

“भाऊ.”

“काय ताई? काय हवे?”

“काही नको. उदय आला का?”

“आज येईल.”

“तार केलीस का?”

“नाही.”

“तार कर रे. होऊ दे रूपया खर्च. एवढे माझे प्राण जाणार आहेत तेथे रूपयाचे काय घेऊन बसलास? आज तार कर. भरपूर पैशांची मोठी तार कर.”

“करतो हो.”

“आज तार केलीस म्हणजे केव्हा पोचेल?”

“दुपारी पोचेल. तो लगेच निघाला तर उद्या पहाटे येईल.”

“उद्या गुरूवार ना?”

“गुरूवार, एकादशी.”

“वा ! छान वार आहे. उदयचे वडील एकादशीसच वारले. जा तार कर.”

मामाने भाच्यास तार केली. त्या वेळेस भाचा निघण्याच्याच तयारीत होता.

उदय गाडीत बसला. सरला परत गेली. गाडी जात होती आणि उदयचे विचारही सर्वत्र धावत होते. मध्येच त्याचे तोंड फुले, मध्येच ते खिन्न होई. आई भेटेल, ती बरी होईल, तिला मी सुखवीन असे मनात येऊन तो आनंदे. परंतु एखादे वेळी आई देवाघरी गेली तर नसेल असे मनात येऊन त्याला धक्का बसे. पत्र येताक्षणीच आपण निघाले पाहिजे होते. प्रेमसिंधू आई ! तिने माझ्यासाठी आज वीसबावीस वर्षे किती खस्ता काढल्या, किती श्रम केले ! किती तिचे उपकार ! किती तिची माया ! आणि ती आजारी आहे असे कळूनही मी ताबडतोब गेलो नाही. परीक्षा संपली होती तरी गेलो नाही. माझी परीक्षा बुडू नये म्हणून तिने आधी कळवले नसेल. काळजी वाटू नये म्हणून तार केली नसेल. परंतु आई नक्की आजारी असेल, बरीच आजारी असेल म्हणून मामा आले. आणि मी? सरलेच्या प्रेमपाशात होतो. चार दिवस आणखी राहिलो. सरले, आई जर भेटली नाही तर? आपण दोघे अपराधी ठरू. नाही का भेटणार आई, का ती मुलाला सोडून जाईल? मुलाला आता आपली काय जरूर? त्याला अधिक प्रेमाचे माणूस भेटले आहे असे तर तिच्या आत्म्यास नसेल कळले? आणि सरलेच्या प्रेमात मी रंगलो आहे असे दिसल्यामुळेच तर ती निघून नसेल ना जात? प्रेम शुध्द आहे का? आईला काय वाटेल? आमचे अद्यापि लग्न नाही. आधी आम्ही लग्न का लावले नाही? लग्न लावून मग परस्परांशी संबंध का नाही ठेवला? एकदम कायदेशीर पतिपत्नी म्हणून का नाही झालो? सरला अधीर होती. ती निराश होती. आणि एकदम लग्न लावून आम्ही कोठे राहणार? परंतु कोठे राहावयाचे ही फिकीर होती तर आणखी काही दिवस दुरूनच प्रेम नको होते का घ्यायला? आमचे का चुकले? परंतु आम्ही एकमेकांस अंतर थोडेच देणार आहोत? मी तिला काही फसवणार नाही. आम्ही एकमेकांची आहोत. देवाला माहीत आहे. आमचे खरेच लग्न लागलेले आहे. हृदयाच्या वेदनांनी व भावनांनी लावलेले लग्न. अश्रूंनी व स्मितांनी लावलेले लग्न. मी तिला फसवणार असेन तर ते करणे पाप आहे. परंतु सरलेला मी फसवणार नाही. अशा प्रेमळ व हळुवार हृदयाच्या मुलीस कोण फसवील? निराशा व दु:ख यांनी पोळून होरपळून ती निघाली होती. म्हणे “माझी ही पहिली दिवाळी.” तिच्या जीवनात लागलेला प्रेमाचा हा पहिला दीप. तो का अमंगळ आहे. पापरूप आहे?

आई, तुला मी सारे सांगेन. तू का रागावशील? स्त्रीहृदयाची तुलाही नाही का कल्पना येणार? तू आशीर्वाद देशील, का तोंड नको दाखवू असे म्हणशील? काय करशील तू? आई, तू आई आहेस. तुला रूचले नाही तरीही तू आशीर्वाद देशील. देव-धर्म रागावतील. परंतु माता रागावणार नाही.

उदय अशा निरनिराळया विचारस्थितींतून जात होता. जीवनाकडे निरनिराळया दृष्टींनी पाहात होता. मध्येच तो कविहृदयाचा होई. सारे त्याला रमणीय वाटे. सरलेचे अश्रू त्याला आठवत. ते पावसातील भिजणे त्याला आठवे. तो रूमाल व त्यावरची ती पाखरे ! त्याच्या डोळयांसमोर सारे येई व तो कौतुकाच्या, स्नेहाच्या, सौंदर्याच्या भावनांवर नाचे. तो मध्येच संतवृत्तीचा होई. त्याला सारे सुंदर व मंगलच मग दिसे. संताला सर्वत्र मांगल्य दिसते. आणि मध्येच तो वीरवृत्तीचा होई. संकटे आली तर झगडू. आपण बहिष्कृत झालो तर? आईने मला दूर केले, सरलेला तिच्या पित्याने हाकलून दिले तर? काही हरकत नाही. आम्ही निर्भयपणे व निर्मळ मनाने नांदू. टीकांना जुमानणार नाही. परंतु त्याची ती कविवृत्ती, ती संतवृत्ती, ती वीरवृत्ती त्या सार्‍या लुप्त होत. आणि मग त्यांच्या दृष्टीला सारे कुरूप व हीन दिसू लागे. “कसले काव्य नि कसले काय ! कसली प्रेमाची दिव्यता व मधुरता ! आम्ही जणू भोगी किडे बनलो. सारासार विवेक बाजूला ठेवला. वासनांचे गुलाम बनून आम्ही परस्परांस मिठया मारल्या. आम्ही खोल गर्तेत पडलो. चिखलात बरबटलो.” आणि असे विचार मनात आले म्हणजे तो कावरा-बावरा होई. खरेच का आपण नि:सार आहोत? सरलेच्या व माझ्या प्रेमात केवळ का विषयताच आहे? त्या प्रेमात आसक्ती असेल; परंतु केवळ का आसक्तीच आहे? तेथे उदारता, सहानुभूती, त्याग, एकमेकांत मिळून जाण्याची वृत्ती हे नाही का? यांना का काही अर्थ नाही? सायंकाळच्या निर्मळ प्रकाशापेक्षा काळया मलिन ढगांवर पडलेला प्रकाश अधिकच सुंदर दिसतो. आसक्तीच्या मलिन पार्श्वभूमीवरील प्रेम हे रमणीयतर आहे. सारे आरंभ क्षुद्र असतात. परंतु त्यांतूनच पुढे महनीयताही प्रकट होते. या आसक्तिमय प्रेमातूनच विशुध्द प्रेमाचा संभव होईल.

माझ्या जीवना ! तुझा मी तिरस्कार करीत नाही. तुझ्यातील भल्या-बुर्‍याला मला मिठी मारूदे. सारे चाखू दे. पाहू दे. हे सारे माझे आहे. वासना माझ्या. विचार माझे. मांगल्य माझे. सर्वांचा मला समन्वय करू दे. अविरोध करू दे. उदय, असा गांगरून नको जाऊस. जे जे तुझ्यात आहे, त्याचा मेळ घालायला शीक. सर्वांना नीट जागा दे. घाबरू नकोस.

अशा विचारात उदय होता. त्याने ट्रंकेतून एक पुस्तक काढले. त्याला का वाचायचे होते? त्या पुस्तकात काही तरी होते. ते तो पाहात होता. काय होते त्यात? तेथे सरलेचा व त्याचा फोटो होता. त्या फोटोकडे तो पाहात होता. आणि त्याने डोळे मिटले. आईचा फोटो हवा काढायला. मायलेकरांचा फोटो. परंतु आई असेल का? गेली असली तर? मग कोठला फोटो? परंतु आई असेल. या बाळाला, तिच्या लाडक्या उदयला आशीर्वाद दिल्याशिवाय ती जाणार नाही. असे विचारकल्लोळ उठत होते. नि कल्याण स्टेशन आले, तो उतरला. तो त्याला तेथे कोण दिसले? ज्यांच्याकडे आई स्वयंपाक करी त्यांच्याकडील ती सारी मंडळी तेथे होती. बंडू होता, नली होती, त्यांची आई होती, त्यांचे वडील होते. इतर मंडळी, गडीमाणसे, सारी होती.

“काय रे उदय?” बंडूने विचारले.

“तुम्ही कोठे चाललात सारी?” त्याने विचारले.

“नलीच्या लग्नाला.”

“माझी आई कशी आहे?”

“अत्यवस्थ आहे. माझी आई परवा भेटून आली होती. तुझी आई सारखी तुझी आठवण काढीत आहे.

“उदय, आई आजारी होती तरी कोठे रे होतास?”

“मी माझे लग्न लावीत होतो.”

“उदय, थट्टा काय करतोस?”

“नलू, श्रीमंतांची लग्ने जमतात व गरिबांची जमत नाहीत वाटते?”

“तुझ्या डोळयांवर केलेली कविता तुला आवडली का?”

“मी ती फाडून टाकली.”

“का?”

“माझ्या डोळयांवर कविता करण्याचा हक्क तुला नाही.”

“मग कोणाला?”

“सरलेला.”

“कोण रे ही सरला? तुझी बायको वाटते? लग्न मनात लागले की जनात?”
“मनात लागले. जनातही लागल्यासारखे आहे.”

“नलू, चल; तिकडे बाबा बोलावीत आहेत.”

नलू व बंडू निघून गेली. उदय तेथेच होता. त्याची गाडी लगेच येणार होती.
ती पाहा आलीच भुसावळकडे जाणारी गाडी. गर्दी झाली. उदय डब्यात शिरला. ती पाहा नली आली. धावत आली.

“उदय, उदय !”

“काय?”

“ही घे चिठ्ठी, आपली पुन्हा भेट होणार नाही. तुझी आई दोन दिवसांची सोबती ! मग तू कोठे जाशील? मी कोठे असेन? परंतु कोठेही असलो तरी कधीमधी एकमेकांस आठवू. तुझ्या डोळयांवर मी कविता करीत राहीन. त्याचा राग नको मानू. मी तुला न कळता दुरुन हा हक्क बजावीन. जा, सुखी हो. आई भेटो.”

शिट्टी झाली, गाडी निघाली. नली उभी होती, ती आता दिसेनाशी झाली. उदयने ती चिठ्ठी वाचली. काय होते तीत?

“उदय,

तुझ्यावर माझे प्रेम होते, मी आईबाबांस तसे सांगितले. तुला मी तसे स्पष्ट लिहिले नव्हते. एकदोन पत्रे तुला लिहिली होती. माझी श्रीमंती आड आली. तू आमच्याकडच्या स्वयंपाकीणबाईंचा मुलगा. बाबांना राग आला, आणि त्यांनी घाईघाईने हे माझे लग्न जमवले. मी मोठया जहागीरदाराच्या घरी पडणार आहे. संपत्तीत लोळेन. परंतु मन कोठे असेल? पुढील जन्मी तरी तू माझा हो. कोण रे ही सरला? तू थट्टा केलीस की खरोखरच कोणी तुला मिळाली? सुखात राहा. गाडी येईल तुझी. मला कधी मनात आठव. तुझ्या सरलेला माझे नाव नको सांगू. ही तुझी-माझी गोष्ट आता तुझ्या-माझ्याजवळच राहो.

- नली.”

उदयने ती चिठ्ठी खिशात टाकली. फाडली नाही. दुसर्‍याच्या भावना पटल्या नाहीत, त्या स्वीकार्य वाटल्या नाहीत, तरी त्यांची विटंबना करू नये. त्याने ती चिठ्ठी खिशात ठेवली.

बाहेर आता रात्र होती. उदयला झोप येत नव्हती. आई अत्यवस्थ असल्याचे त्याला कळले होते. दोन दिवसांची सोबती ! परंतु भेटेल का तरी? असेल का माझी इतकी पुण्याई?

नाशिक आले. त्याने स्टेशनवर द्राक्षांची करंडी घेतली. आईला होतील. नाशिकमध्ये एके काळी तो राहिलेला होता. त्याचे बाळपण नाशकात गेले. त्याला अनेक गोष्टी आठवल्या. गंगेत बुडून मरण्याची वेळ आठवली. आईच्या वात्सल्याच्या अनेक आठवणी त्याला आल्या. त्या पवित्र प्रेमळ स्मृतींच्या गंगेत तो डुंबत होता.
तो आता जरा पडला. विचार करून करून त्याचे डोके सुन्न झाले होते. त्याला झोप लागली. तो एकदम जळगावला जागा झाला. घाईघाईने तो उतरला. अद्याप पहाट नव्हती झाली. त्याने एक टांगा केला. तो घरी जायला निघाला.

त्याचे हृदय खालीवर होत होते. आई ! भेटेल का आई ! हेच सारखे मनात येत होते. आले घर. थांबला. त्याने सामान उतरून घेतले. मामा बाहेर आले. त्या लहानशा जागेत बरीच मंडळी होती.

“मामा, आई कशी आहे?”

“गेली हो तुझी आई. थोडा उशीर झाला. दोन तासांपूर्वीच तिने राम म्हटला.”

मामांनी भाच्याला हात धरून आत आणले. सामान आणले. उदय आईच्या मृतदेहाजवळ बसला. त्याने “आई” अशी हाक मारली. कोण ओ देणार? ते प्रेमळ ओठ मुके झाले होते. ती वत्सल दृष्टी बंद झाली होती. आईच्या ओठांवर तुळशीपत्र होते. गळयात तुळशीची माळ होती. पवित्र पावन मूर्ती. त्याने पुन्हा “आई” अशी हाक मारली. त्याने आईच्या वक्ष:स्थलावर डोके ठेवले. त्याचे अश्रू थांबत ना. त्याने उठून आईच्या पायांवर मस्तक ठेवले. ते पवित्र चरण डोळयांतील उष्णोदकाने त्याने प्रक्षाळिले.

तो आईचे पाय धरून बसून राहिला. मधून त्याला हुंदके येत होते.

“उदय, थोडा उशीर झाला. उगा रडू नको. आशीर्वाद देऊन ती देवाघरी गेली. तुझी आई तुझ्याजवळ आहे. प्रेममयी मातेला कोण नेणार? देह गेला. परंतु मातेचे प्रेम चिरंजीव आहे. ते तुझ्या जीवनाला पोशीत राहील. उगी रडू नको. मी आहे तुला. जशी माझी मुले तसा तू.” मामा समजावीत होते.

आता उजाडले. नेण्याची तयारी सुरू झाली. मंडळी जमली. उदयने अश्रू पुसले. आईचे पाय धरून तो बसला होता. त्याचे डोळे मिटलेले होते. त्याचा आत्मा का आईच्या आत्म्याला भेटायला जात होता?

“उदय, चल बाळ. ऊठ.” मामा म्हणाला. उदयने हातात मडके धरले. मंडळी निघाली. उदय गंभीर होता. एक एक अश्रूही आता येत नव्हता. आणि स्मशानात मंडळी आली. सरण रचण्यात आले. मातेचा देह ठेवण्यात आला आणि अग्नी देण्यात आला.

उदय उभा होता. मातेचा देह भस्म होत होता. आणि उदयचे हृदय भाजून निघत होते. तो पाहात होता. तो त्या ज्वाळा पाहात होता. धडधडत वर जाणार्‍या ज्वाळा ! उदय, काय पाहतोस? कशाचा विचार करतोस? या ज्वाळा माझ्यातील मालिन्य नष्ट करोत असे का का तू म्हणत आहेस? मातेची क्षमा का तू मागत आहेस? अरे जगाजवळ क्षमा मागावी लागते. आईजवळ रे कसली क्षमा मागायची? मुलाने आईजवळ क्षमा मागितली तर आईला कसेसेच होते. मुलाने आईजवळ जावे, तिला बिलगावे. आईने कधीच क्षमा केलेली असते. तिला तुमच्या प्रेमाची अपेक्षा असते. उदय, असा काय बघतोस? पुढे पुढे कोठे जातोस? उदय आगीत उडी घेणार की काय? तो पाहा चालला. परंतु मामाने त्याला एकदम ओढले.

“उदय, हो मागे. वेडा कुठला.” मामा म्हणाला. मामाने धरले. परंतु मामांचा हात सुटताच उदय तेथे जमिनीवर धाडकन पडला. सारे धावले. कोणी पाणी आणले. कोणी काही केले, परंतु उदयला शुध्द येईना.

एकजण गावात धावत गेला. तो मोटार घेऊन आला. मोटारीपर्यंत उदयला उचलून नेण्यात आले. मोटारीत घालून त्याला घरी आणण्यात आले. डॉक्टर आला. त्याने तपासले व इंजेक्शन दिले.

थोडया वेळाने उदयने “आई” अशी हाक मारली.

“उदय-” मामांनी हाक मारली.

“आई, मी तुझ्याकडे येतो. अशी नको पाहूस. आई, येऊ दे आम्हांला. आम्हा दोघांना येऊ दे, आई, आई !”

उदय वातात होता.

“उदय-” मामा हाक मारीत होते.

उदयला नीट शुध्द येईना, स्मृती येईना. एके दिवशी त्याला घेऊन मामा वर्‍हाडात निघून गेले. जळगावचा खेळ संपला.

मामांकडे उदय खाटेवर पडून असतो. “आई कोठे आहे? आई, आई गेली ! गेली आई. सरले, आई गेली. अरेरे ! आई गेली. संपले सारे. आई गेली.” एवढेच तो म्हणत असतो. कधी येईल त्याला स्मृती? कधी येईल शुध्द?

***