Success to failure books and stories free download online pdf in Marathi

यश ही अपयशाची पायरी होऊ शकते...

यशस्वी होणे खूप कठीण आहे पण अहो अपयशी होणे त्याच्यापेक्षा कठीण आहे ! कारण अपयशी झाल्यावर यशस्वी काळात असलेल्या सर्व गोष्टी क्षणात दिसतात आणि अपयशी कसं झालं हे सुद्धा डोळ्यासमोर दिसते. जेव्हा माणूस अपयशी होतो ना तो शरीराने नाही तर मनाने हारतो. डोळ्यामध्ये अश्रू असतात ते भरलेले असतात पण एकही अश्रू पडत नाही , तरीही मनात एक दडून ठेवलेली गोष्ट असते की नाही मी करू शकते! मी यशस्वी होऊ शकते! मी हार माणू शकत नाही !तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व...चूका समजतात तेव्हा समजते यशस्वी झाल्यावर लोकांचे विचार समजतात , त्यांना वाटतं हे सोप्प आहे पण होय यशस्वी झाला त्यालाच माहिती यश मिळणे किती सोपे आहे ! आपण ऐकलं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण आपण कधी असं नाही ऐकलं की यश ही अपयशाची पायरी आहे.

आता तुम्ही बोलत असतील की हे असं कसं? कारण यश मिळणे आणि टिकवणे आणि त्याचा गर्व टाळणे, पुढच्या यशाची तयारी करणे , वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, यशाच्या गर्वामध्ये न पडणे , अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे आपण अपयशी होतो. आणि क्षणाक्षणामध्ये आपल्याला अपयशामुळे सतत मनात त्रास होत असतो. त्याच्यामध्ये काही लोक तिथेच हार मानतात. कारण दिसतं तसं नसतं ते खूप कठीण असते . त्या माणसाला किती त्रास होत असेल आपण शब्दात मांडू शकत नाही . अपयशी माणसाला या दुनिया मध्ये जगू देत नाही खरं म्हटलं तर लोकसंख्या वाढत चालली आहे तसेच अपयशी माणसाची संख्या वाढत जाते आता याच्यात दोष लोकसंख्येला द्यावा की अपयशाला ?

अपयशाला घेऊन चालणे खूप कठीण असते . आपल्याला यशस्वी बनायची आहे तर आपल्याला failure ,regreat, stress , depression, family tension, या सर्व गोष्टी सहन करून आपल्याला यशाकडे चालावे लागेल. आपले एपीजे अब्दुल कलाम सर यांनी आपल्याला सांगितलेले 'हमे हार तो चाहिये.. पर गले मे जीतने के बाद मिलने वाला हार चाहिये.. 'म्हणून हार मानून जाऊ नका तुमच्याकडे पुन्हा संधी येणार आहे त्या संधीचे सोनं करण्यासाठी तयारी करा. जर तुम्ही अपयशामध्येच गुंतून जाशील तर यश तुमची वाट बघेन आणि जर अजून उशीर झाला तर तो यश वाट बघणार नाही . वेळेचा उपयोग करा बोलून चालणार नाही करून चालेल तेव्हा सर्व बघतील तुमच्या सक्सेस ला तेव्हा ते हीच बोलतील LUCKY आहे . काही वेळ गेलेली नाही पण वेळ खूप कमी आहे ,वेळ तुमच्या हातात आहे तुमच्या आई-वडिलांना अजून किती त्रास देणार त्यांच्या डोळ्याकडे बघा त्यांच्या शरीर थकलेली आहे, अजून किती त्रास देणार त्यांची क्षमता संपलेली आहे ,अजून किती काम करणार त्यांची वय झालेली आहे ,आता तुम्हाला यशाकडे पळावीस लागणार आहे जिथे थांबला तिथेच संपेल जिथे थकला तिथेच पडेल  .

काम अपूर्ण ठेवला तिथेच ते पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे वेळ समाप्त होण्याची वेळ बघू नका स्वतःला जास्त शहाणे समजू नका यश मिळणार आहेस हे मनात ठेवा. निगेटिव्ह गोष्टीला दुर्लक्ष करा हे खूप अवघड आहे पण करणे खूप गरजेचे आहे पण हे बोलणे पण सोपा आहे करणे अवघड आहे.

देवाला बोला तू माझा पिता आहे तू माझी आई आहे मला यशस्वी बनव मला स्वतःला प्रूफ करायचे आहे आणि त्याच्यासाठी तुझी सुद्धा गरज आहे देवा तू माझ्या संग आहे याचा मला तुम्हा सोडू शकत नाही कारण तू माझा देव आहे मला साथ दे तर आता आपण यशस्वी होऊ हे मला माहिती आहे की तुम्ही यशस्वी व्हाल !